
Modi Govt Failure | सार्वजनिक क्षेत्रातील चारही विमा कंपन्यांना (पीएसयू) गेल्या पाच वर्षांत आरोग्य विमा व्यवसायात २६,३६४ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. नुकत्याच संसदेत सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालानुसार सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या आरोग्य विमा विभागातील तोट्यामुळे इतर क्षेत्रांचा नफा कमी झाला आहे किंवा एकूण तोट्यात आणखी वाढ झाली आहे.
चार सरकारी विमा कंपन्यांचा एकूण तोटा :
अहवालानुसार, २०१६-१७ ते २०२०-२१ या आर्थिक वर्षात न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (एनआयएसीएल), युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (यूआयआयसीएल), ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (ओआयसीएल) आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एनआयसीएल) या चार विमा कंपन्यांचा एकूण तोटा २६,३६४ कोटी रुपये होता.
बाजारातील हिस्सा सातत्याने कमी :
सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांसाठी आरोग्य विमा हे दुसऱ्या क्रमांकाचे व्यवसाय क्षेत्र आहे. प्रथमतः वाहन विमा क्षेत्र आहे. गेल्या पाच वर्षांत या क्षेत्राचा ग्रॉस डायरेक्ट प्रिमियम १,१६,५५१ कोटी रुपये होता. या अहवालानुसार, खासगी कंपन्यांच्या तुलनेत आरोग्य विमा व्यवसायातील सरकारी विमा कंपन्यांचा बाजारातील हिस्सा सातत्याने कमी होत आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांनी मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नसल्याचेही लेखापरीक्षणात आढळून आले असून समूह आरोग्य विमा विभागातील या कंपन्यांचे एकत्रित प्रमाण १२५ ते १६५ टक्के असल्याचे कॅगने म्हटले आहे. दाव्यांच्या व्यवस्थापनाबाबत अहवालात म्हटले आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या आयटी प्रणालीत पडताळणी तपासणी आणि नियंत्रणांचा अभाव आहे. याचा परिणाम कामकाजाव्यतिरिक्त अहवाल देण्याच्या प्रणालीवर होतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.