
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये विविध प्रकारच्या योजना आहेत ज्यात देशातील लाखो लोक गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा धोका नाही. त्यातून चांगला परतावाही मिळतो. त्यामुळेच पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जर तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेत दीर्घकाळासाठी पैसे गुंतवायचे असतील आणि जोखीमही टाळायची असेल तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.
पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र (केव्हीपी) मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. ही भारत सरकारची डबल मनी योजना आहे जिथे तुम्हाला वार्षिक ६.९ टक्के व्याजदर मिळतो आणि तो १२४ महिन्यांत (१० वर्षे आणि ४ महिने) दुप्पट होतो. ही योजना भारतातील बहुतेक पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून उपलब्ध आहे.
किसान विकास पत्र योजना काय आहे :
किसान विकास पत्र (केव्हीपी) ही भारत सरकारने पुरवलेली बचत योजना आहे. केव्हीपी योजना उच्च व्याज दरांद्वारे त्याची परिपक्वता कालावधी पूर्ण केल्यावर भरीव परतावा देते. भारत सरकारची ही जोखीममुक्त गुंतवणूक योजना आपल्या नागरिकांना दीर्घकालीन बचत करण्यासाठी प्रोत्साहित करते.
कोण गुंतवणूक करू शकतो :
किसान विकास पत्रामध्ये 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा कोणताही नागरिक गुंतवणूक करू शकतो. किमान गुंतवणुकीची रक्कम १००० रुपये असून कमाल गुंतवणुकीवर मर्यादा नाही. किसान विकास पत्रामध्ये 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलाच्या वतीने कोणतेही प्रौढ खाते उघडता येते. अल्पवयीन मुलगी 10 वर्षांची होताच त्याच्या नावाने अकाऊंट तयार केलं जातं. इतकंच नाही तर 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे तीन लोक संयुक्त खातेही उघडू शकतात.
परताव्यावर टीडीएस कापला जात नाही :
खरेदी केल्यानंतर एक वर्षाच्या आत जर कोणी ही योजना परत केली तर त्याला कोणत्याही प्रकारच्या व्याजाचा लाभ मिळत नाही. पोस्ट ऑफिसची ही योजना आयकर कायदा ८० सी अंतर्गत येत नाही. त्यामुळे गुंतवणुकीच्या रकमेवर मिळणाऱ्या परताव्यावर कर भरावा लागतो. मात्र, या योजनेत टीडीएस कापला जात नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.