
Tata Group Stocks | टाटा समूह हा भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह आहे. टाटा उद्योग भारतातील एके प्रसिद्ध आणि दिग्गज व्यावसायिक घराणे म्हणून ओळखले जाते. टाटा समूहामध्ये एकूण 100 पेक्षा जास्त कंपन्याचा समावेश होतो. त्यामुळे सर्व कंपनीवर लक्ष ठेवणे आणि कंपनीची कामगिरी पाहणे थोडे कठीण होते. म्हणूनच या लेखात आम्ही तुम्हाला टाटा समूहातील शेअर्स बद्दल वेळोवेळी माहिती देत असतो. या लेखात आपण माहिती घेऊ की टाटा समूहातील कंपन्यांची कामगिरी कशी आहे. टाटा समूहातील अशी एक कंपनी, ज्याने फक्त एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 120 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. चला तर मग अशाच एका कंपनीबद्दल सविस्तर जाणून घेऊ
आपण ज्या कंपनी बद्दल माहिती घेणार आहोत, त्या कंपनीचे नाव आहे, इंडियन हॉटेल्स. इंडियन हॉटेल ही कंपनी टाटा समूहाची दिग्गज कंपनी असून देशभरात हॉटेल व्यवसायात गुंतलेली आहे. या कंपनीने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 120 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. म्हणजेच आजपासून वर्षभरापूर्वी जर तुम्ही इंडियन हॉटेल्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर तुम्हाला आता तब्बल 2.20 लाख रुपये परतावा मिळाला असता. अल्प मुदतीचा विचार केला तर या शेअर नी मागील 3 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 35 टक्के परतावा मिळवून दिला आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीच्या स्टॉकने मागील 6 महिन्यांत आपल्या भागधारकांना तब्बल 65 टक्के परतावा मिळवून दिला आहे. म्हणजेच शेअर बाजारातील चढ-उतारांच्या झटक्यातुन हा शेअर वाचला होता.
इंडियन हॉटेल्स शेअर्सची किंमत :
इंडियन हॉटेल्सचे शेअर्स NSE वर 307.50 रुपयांवर ट्रेड होत होते. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर च्या किमतीत 1 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. दुसरीकडे, भारतीय हॉटेल्सच्या शेअर्सची नीचांक पातळी किंमत 304.10 रुपये आणि उच्चांक पातळी किंमत 313.80 रुपये आहे. याशिवाय मागील एका वर्षाची शेअर ची नीचांक पातळी किंमत 138.13 रुपये होती आणि उच्चांक पातळी किंमत 313.80 रुपये आहे.
इंडियन हॉटेल्स कंपनीचा मूलभूत पाया मजबूत आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीच्या ताळेबंदावर नजर टाकली तर, कंपनीची आर्थिक बाजू खूप मजबूत असल्याचे दिसून येते. कंपनीने मागील एका वर्षात तब्बल 4000 कोटी रुपयेची कमाई केली आहे. यामुळे कंपनीचे कॅश फ्लो सकारात्मक आहे. कोणत्याही कंपनीसाठी हे घटक खूप महत्त्वाचे मानले जातात. दुसरीकडे, जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने तब्बल 30 टक्के नफा कमावला आहे. अशा परिस्थितीत कंपनी चांगली कामगिरी करत राहीली तर गुंतवणूकदार जबरदस्त परतावा कमवू शकतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.