
Tata Power Vs Adani Power Share | काल शुक्रवारी शेअर आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग सेशन होता. आणि शेअर बाजारात साहजिकच तेजी-मंदी पाहायला मिळत होती. मात्र ऊर्जा क्षेत्रातील कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स, अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स, एनटीपीसी, पीएफसी, आरईसी या सर्व पॉवर स्टॉकमध्ये मजबूत खरेदी पहायला मिळत होती.
शेअर्सची कामगिरी :
अदानी पॉवर :
या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 372.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.84 टक्के वाढीसह 369.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
टाटा पॉवर
या कंपनीचे शेअर्स 276.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.16 टक्के वाढीसह 269.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
NTPC
या कंपनीचे शेअर्स 372.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.73 टक्के वाढीसह 240.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
पॉवर फायनान्स कंपनी
या कंपनीचे शेअर्स 306.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 12.71 टक्के वाढीसह 306.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
REC
या कंपनीचे शेअर्स 272.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.92 टक्के वाढीसह 269.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
टाटा पॉवर, एनटीपीसी, पॉवर फायनान्स, आरईसी या कंपन्यांचे शेअर्स शुक्रवारी 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. भारतातील विजेचा वापर मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 16 टक्क्यांनी वाढला असून 151.66 अब्ज युनिट नोंदवला गेला आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने सर्व राज्यांना त्यांच्या वीज वितरण कंपन्या तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त वीज निर्मिती कंपन्यांना वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी तत्पर राहण्याचे निर्देश जारी केले आहेत.
मागील आठवड्यात वीज उत्पादनात विक्रमी 241 गिगावॅट एवढी विक्रिमी पातळी ओलांडली आहे. दरम्यान पुढील दहा वर्षात भारताची विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी नॉन-हायड्रो रिन्युएबल स्त्रोतांवर भर देऊन त्याची क्षमता 70 टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. फिच ग्रुपच्या बीएमआयने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, 2032 पर्यंत भारत कोळशापासून निर्माण केल्या जाणाऱ्या वीज निर्मितीवर अधिक अवलंबून होणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.