शेतकऱ्यांच्या वादळाच्या तडाख्याने सरकारचा पालापाचोळा उडून गेला असता : सामाना
![](https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/sena_on_bjp_kisan_march.jpg?v=0.941)
मुंबई : शेतकऱ्यांच्या वादळाच्या तडाख्याने सरकारचा पालापाचोळा उडून गेला असता अशी भीती सत्ताधाऱ्यांमध्येमोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याशिवाय दुसरा मार्ग सरकारकडे राहिला नसल्याची टीका सामानातून फडणवीस सरकारवर करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजधानीत थडकलेल्या शेतकरी वादळाचा तडाखा खूप मोठा होता आणि त्यामुळेच सरकारला लेखी आश्वासन देणे भाग पडलं. शेतकऱ्यांनी मुंबईत येऊन दिलेली ‘थप्पड की गुंज’ फडणवीस सरकारच्या कायमचीच स्मरणात राहील असा सणसणीत टोला शिवसेनेच्या मुखपत्रातून सत्ताधाऱ्यांना लागण्यात आला आहे.
मुंबईत थडकलेल्या शेतकऱ्यांच्या वादळाला पुढे आश्वासनांची लेखी हमी देण्याशिवाय फडणवीस सरकारकडे दुसरा मार्गच उरला नव्हता. आता तरी दिलेलं आश्वासन पाळा नाहीतर शेवटची संधी ‘शेवटची काडी’ ठरेल असा इशाराही सेनेच्या मुखपत्रातून फडणवीस सरकारला देण्यात आला.
आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर बोचरी टीका केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, नाशिकहून १८० किमीच अंतर कापत शेतकरी आणि आदिवासींचा मोर्चा राजधानी मुंबईत परतला आणि सरकारकडून लेखी आश्वासन घेऊनच माघारी परतला. शेतकरी आणि आदिवासींच्या या अभूतपूर्व मोर्चातून सेनेला फडणवीस सरकारवर सामानातून निशाणा साधण्याची नामी संधीच मिळाली आहे.
पुढे असेही म्हटले आहे की कालपर्यंत जे सरकार शेतकरी आणि आदिवासींच्या मोर्च्याबाबत ढिम्म होते ते सोमवारी अचानक संवेदनशील झालं. शेतकरी आणि आदिवासींच्या आक्रोशाचा आवाजच ज्यांच्या कानापर्यंत पोहोचत नव्हता ते एकदम त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक झाले असं नमूद करत फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.
सरकारच्या ऑनलाईन आणि पारदर्शक गोंधळामुळेच संपूर्ण कर्जमाफीचा प्रश्न आजही पेटलेलाच आहे. शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करण्याच्या शिवसनेच्या मागणीचेच ऐतिहासिक रूप गेल्या वर्षी शेतकरी संपात दिसले होते आणि त्यावरच शिवसेनेने जे रान पेटवले होते त्यामुळेच सरकारला शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी लागली होती. परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अंमलबजावणीत घातलेल्या जाचक अटी आणि शर्तीं मुळेच संपूर्ण कर्जमाफी हा केवळ एक फार्सच ठरला होता असं ही अग्रलेखात म्हटले आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, टार्गेट प्राइससह गुंतवणूकीचा सल्ला
-
Suzlon Share Price | तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअरसाठी 'BUY' रेटिंग, कमाईची संधी, आली फायद्याची अपडेट
-
HAL Share Price | PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी, शॉर्ट टर्ममध्ये दिला 221% परतावा
-
Credit Card Application | होय! इन्कम-प्रूफ नसेल तरी मिळेल क्रेडिट कार्ड, हे आहेत सोपे आणि सुरक्षित पर्याय
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या
-
Lotus Chocolate Share Price | रिलायन्स ग्रुपच्या कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 5 वर्षांत दिला 4000% परतावा
-
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता वाढ होणार, आकडेवारीबद्दल अपडेट आली
-
Home Loan Alert | नोकरदारांनो! वयाच्या 40 व्या वर्षी गृहकर्ज घेताय? या 5 गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा...
-
ITR Filing | पगारदारांनो! ITR डेडलाईन चुकल्यास केवळ दंडच नव्हे, तर 'हे' 5 नुकसान देखील होणार
-
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'व्या वेतन आयोगाची घोषणा होणार, वेतन-पेन्शन-भत्त्यांमध्ये वाढ