Andheri East By Poll Election | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळालाय. मुंबई उच्च न्यायालयाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिलेत. त्यामुळे हा शिंदे सरकारला दुसरा झटका असल्याचं मानलं जात आहे.

ऋतूजा लटके राजीनामा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला चांगलाच झटका दिला आहे. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करा आणि याचिकाकर्त्यांना तसे कळवा, असे आदेशच उच्च न्यायालयाने दिला आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्या महापालिकेच्या सेवेत होत्या, त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण पालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचं काय होणार याबद्दल संदिग्धता होती.

अचानक तक्रार दाखल :
काल ऋतुजा लटके यांनी मुंबई पोलीस आयुक्तांसोबत बैठक घेऊन राजीनाम्यावर निर्णय घेण्याची विनंती केली होती. मात्र आयुक्तांकडून चालढकल करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. मात्र प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ऋतुजा लटके या कोर्टात जाणार हे लक्षात येताच त्यांच्याविरोधात अंधेरी वेस्ट मधून एका व्यक्तीने भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे ते सुद्धा आज दुपारी २:३० नंतर न्यायालयात कळविण्यात आलं, मात्र त्यावर कोणतीही अधिक माहिती दिली नाही. त्यामुळे महापालिकेच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त करण्यात येतं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Andheri East By Poll Election Rutuja Latke will contest by election in Andheri East 13 October 2022.

आयुक्तांसोबत 12 तारखेला बैठकीत राजीनामा मंजूर होतं नाही, कोर्टात जाण्याची चुणूक लागताच 12 तारखेला अंधेरी पश्चिमेतून तक्रार दाखल होते?