8 June 2023 11:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकर्‍यांना तातडीने मदत द्या - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis, wrote a letter, CM Uddhav Thackeray, Farmers issue

मुंबई, ०५, नोव्हेंबर: राज्यातील शेतकऱ्यांकडे राज्य सरकारने जाहीर केलेलं पॅकेज अजून पोहोचलेलं नाही. परिणामी बळीराजा हवालदिल झाल्याचं ग्रामीण भागातील सध्या चित्र आहे. परतीच्या पावसात अतिवृष्टी-बोंडअळीच्या रोगामुळे कापूस-सोयाबीनचं झालेलं प्रचंड नुकसान, जे बाधित शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेली मदत तसेच शेतमाल खरेदी सुरु होण्यास होत असलेला उशीर यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारने शेतकर्‍यांना लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी करणारे लेखी पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

संबंधित पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, “बोंडअळी, बोंडसडीमुळे यंदा विदर्भात कापसाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. आताच्या अंदाजानुसार ५० टक्क्यांच्या वर हे नुकसान असून, ते अजून वाढत जाणार आहे. साधारणत: एकरी सहा क्विंटल उत्पादन अपेक्षित असताना अनेक ठिकाणी एकरी एक क्विंटल आणि फार कमी ठिकाणी दोन क्विंटलपर्यंत उत्पादन होताना दिसून येत आहे. अतिवृष्टीने सोयाबीनचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीनचे नुकसान जवळजवळ ८० टक्क्यांच्या जवळपास आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात अशीच स्थिती आहे. इतकी गंभीर स्थिती असतानाही कुठेही सरकारच्या वतीने स्थानिक प्रशासनाला कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत.”

 

News English Summary: The package announced by the state government has not yet reached the farmers in the state. As a result, there is a picture in the rural areas that farmers has become distraught. Leader of Opposition Devendra Fadnavis has lashed out at the Mahavikas Aghadi government over the huge loss of cotton and soybean due to heavy rains and bollworm in the rains, which has not yet helped the affected farmers.

News English Title: Devendra Fadnavis wrote a letter to CM Uddhav Thackeray over farmers issue News updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x