मुंबई, ०५, नोव्हेंबर: Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी झालेल्या अटकेरून ठाकरे सरकारवर आणीबाणी लादल्याचे आणि हुकूमशाहीचे आरोप विरोधकांकडून करण्यात आला. ‘अर्णब गोस्वामी यांस २०१८ मधील एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे.
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा भारतीय जनता पक्षाने तीव्र निषेध केला आहे. तसेच समाज माध्यमांच्या माध्यमातून देखील यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र आता याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
‘अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेला संशयित आरोपी अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर (महाराष्ट्र) विरोधी पक्षनेते आणि इतर बच्चा पार्टी ज्या आवेगाने विलाप करत आहेत ते पाहून मला एक गोष्ट आठवते ती म्हणजे ‘देवाच्या काठीला आवाज नसतो पण दणका जबरदस्त बसतो’ असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेला संशयित आरोपी अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर (महाराष्ट्र)विरोधी पक्षनेते आणि इतर बच्चा पार्टी ज्या आवेगाने विलाप करत आहेत ते पाहून मला एक गोष्ट आठवते ती म्हणजे ‘देवाच्या काठीला आवाज नसतो पण दणका जबरदस्त बसतो’ (1/2)#MumbaiPolice
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 4, 2020
News English Summary: The BJP has strongly condemned the arrest of Arnab Goswami. Also, through social media, we have seen strong criticism of the Thackeray government. But now NCP state president Rupali Chakankar has given a strong reply to BJP leaders.
News English Title: NCP Womens state president Rupali Chakankar criticized BJP leaders over politics behind Arnab Goswami arrest news updates.
