मुंबई: दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीविषयी संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सारवासारव केली आहे. “शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जे विधान केले, ते वेगळ्या कारणांमुळे होते. कोणताही शिवसैनिक इंदिराजींबद्दल अपशब्द काढणार नाही,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

“इंदिरा गांधींबद्दल स्वत: शिवसेना प्रमुख आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदर होता. त्यांच्याबद्दल कोणताही शिवसैनिक अपशब्द काढणार नाही. त्यांचा हेतू साफ होता. यापूर्वी किंवा यानंतरही कोणताही शिवसैनिक इंदिरा गांधींबद्दल बोलणार नाही,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

राऊत यांनी केलेलं विधान हे वेगळ्या संदर्भता होतं, त्यांचे ते निरिक्षण होतं. त्यामुळे प्रत्येक विधानं हे त्या संदर्भातणं बघणं गरजेचं आहे. या मुद्द्यावर विरोधकांना प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, आता निवडणुका होऊन गेल्या आहेत त्यामुळे राजकीय न बोलता कामाबद्दल बोलावं.

दरम्यान, ठाकरे सरकारनं कुठल्याही कामांना स्थगिती दिलेली नाही. फक्त या आधीच्या ज्या प्रकल्पांमध्ये आपण पैसा चांगल्या पद्धतीने वापरु शकतो, त्याबाबत रिव्ह्यू केला जात आहे. आज झालेल्या बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना हेच सांगण्यात आल आहे की, जनतेचा पैसा चांगल्या कामांसाठी वापरला जाईल याची काळजी घ्या असं आदित्य ठाकरे म्हणाले.

 

Web Title:  No Shivsena member will be abusive about former Prime Minister Indira Gandhi says Minister Aaditya Thackeray.

इंदिराजींबद्दल कोणताही शिवसैनिक अपशब्द काढणार नाही: आदित्य ठाकरे