26 April 2024 9:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा
x

राज्यात लॉकडाऊनची गरज नाही, पण पुढचे १५ दिवस महत्त्वाचे: मुख्यमंत्री

Corona Virus Crisis, CM Uddhav Thackeray, Covid 19

मुंबई, १६ मार्च : कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पुढचे १५ दिवस महत्त्वाचे आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरोना हे जागतिक संकट असून त्यावर आपण मात निश्चित करु. पण त्यासाठी आपल्याला राज्य सरकारने दिलेल्या सूचनांच पालन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सध्या तरी राज्यात लॉकडाऊनची गरज नाही. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली तर लॉकडाऊनची गरज भासणार नाही, असं सांगतानाच कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. शाळा, कॉलेज, अम्यूसमेंट पार्क आणि मॉल बंद केले असले, तरी हॉटेल अजूनही सुरूच आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. तसंच धार्मिक ठिकाणी गर्दी करु नये आणि धार्मिक कार्यक्रमही टाळावे, अशी विनंती उद्धव ठाकरेंनी सर्व धर्माच्या धर्मगुरूंना केली आहे.

याचबरोबर, परदेशातून जे काही लोक आले होते. त्यांची तपासणी सुरू आहे. केंद्र सरकारकडून जी यादी देण्यात आली होती. त्यानुसार चाचणी केली जात आहे. तसेच, राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा आणि निवडणुका पुढे ढकलण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जेवढी खबरदारी आपण घेऊ, तेवढं हे संकट आपण दूर करू शकतो, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

News English Summery: Chief Minister Uddhav Thackeray has said that the next 15 days are important in the wake of the spread of the corona virus. Against the precaution, the Chief Minister has again appealed that the house should be avoided. Corona is a global crisis and we will overcome it. But for this we need to follow the instructions given by the state government. He interacted with the media in the wake of the growing outbreak of the Corona virus. Currently there is no need for lockdown in the state. Chief Minister Uddhav Thackeray urged that citizens should follow self-restraint to prevent corona while saying that lockdown will not be required if citizens follow self-sufficiency. Although schools, colleges, amusement parks and malls have been closed, hotels are still open. Citizens should avoid unnecessary travel. Similarly, Uddhav Thackeray urged religious leaders of all religions not to crowd in religious places and avoid religious programs.

 

News English Title: Story Covid 19 Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray on Corona Virus crisis.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x