26 March 2023 5:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme Balance | खुशखबर! PPF मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांच्या खात्यात 31 मार्चला पैसे ट्रान्सफर होणार, अधिक जाणून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा आता निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात परतून स्वतःला OBC नेते घोषित करतील, भाजप त्यांचं स्वागत करेल - रवीश कुमार Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या SBI Bank mPassbook | पासबुक अपडेटसाठी आता SBI बँकेत जाण्याची गरज नाही, असं करा सहज ऑनलाईन अपडेट CIBIL Score | कर्जाचा EMI थकवल्याने डिफॉल्ट झाल्यावरही सिबिल स्कोर कसा सुधारू शकता पहा SIP Calculator | अशी SIP करा म्हणजे 4 वर्षांनंतर 15 लाख रुपयांची कार खरेदी करू शकाल, संपूर्ण गणित पहा
x

‘ये दिवार तुटती क्यू नही..' असं म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार- अजित पवार

Deputy Chief Minister Ajit Pawar, MahaVikas Aghadi, BJP

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ८ वरुन ६० पर्यंत तर आमदारांची संख्या १० पर्यंत जायला हवी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. शिवसेना आपला मित्रपक्ष आहे. मुंबईत शिवसेना एक क्रमांकावर तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असली पाहिजे असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर मुंबई महापालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या वतीने लढवली जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

पुढे ते असं म्हणाले की, ‘ये दिवार तुटती क्यू नही…’ असं म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार आहे. ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी कैसे अंबुजा… एसीसी… बिर्ला सिंमेटसे जो बनी है” अशा शब्दात महाविकासआघाडीवर टीका करणाऱ्या व राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.

मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. याला धक्का लावण्याचे काम भाजपाने पाच वर्षात केले आहे. प्रकल्प राज्याबाहेर नेले. विकासाला खीळ घातली. हे लोकांना पटवून दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या विकासात आड येणाऱ्या लोकांना आडवं पाडून पुढे जायचं आहे, असा इशारा देत मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी फुंकले.

मुंबईत चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसने एकदिवसीय कार्यकर्ता शिबीराचं आयोजन केलं आहे. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आपले सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला दोन महिने झाले शपथ घेऊन. शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा कायदा केला आहे. शिवभोजन थाळी आपण सुरू केली आहे, असे सांगतानाच या सरकारने सत्तेवर येताच मागच्या सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय बदलले आहेत. कदाचित भाजपला हे निर्णय योग्यही वाटत असतील. पण ते निर्णय आम्ही जनतेला फायदा होतो की नुकसान होते हे पाहून बदलले आहेत असं देखील अजित पवार म्हणाले.

 

News English Summery: NCP has organized a one-day activist camp at Somaiya Maidan in Chunabhatti in Mumbai. Speaking at the time, Ajit Pawar strongly criticized the BJP. Our government is trying to solve the problems of the people. It took us two months to swear. The law has been made to compel Marathi subjects in schools. This government has changed the wrong decisions taken by the previous government when it came to power, saying that we have started Shiv Bhoj Thali. The BJP may think these decisions are appropriate too. But those decisions have changed the way we benefit or harm people, Ajit Pawar said.

 

Web News Title: Story deputy chief minister Ajit Pawar slams BJP over Mahavikas Aghadi unbreakable Alliance.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(186)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x