मुंबई: महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर मंगळवारी तिढा सुटला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देते, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आता आपले बहुमत दाखवत ‘महाविकास’आघाडी सत्ता स्थापन करणार आहेत.

‘महाविकास’आघाडी झालेल्या निर्णयानुसार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे त्यांना आमदारकीची शपथ देणार आहेत.

दरम्यान, काही वेळापूर्वी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी राजभवनला जाऊन राज्यपालांची भेट घेतली आहे. त्यामुळे उद्याचा मुख्यमंत्री शपथविधीचा सोहळा जोरदार करण्याचा शिवसेनेचा आणि महाविकासआघाडीच्या मानस असणार यात अजिबात शंका नाही.

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली