25 April 2024 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Wipro Share Price | भरवशाच्या विप्रो शेअर्सबाबत तज्ज्ञांचा इशारा, शेअर होल्ड करावा की सेल करावा? Tata Group IPO | पैसे तयार ठेवा! टाटा गृपचा IPO येतोय, मालामाल होण्याची मोठी संधी, डिटेल्स जाणून घ्या My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार?
x

'ते' दत्तक गाव मुख्यमंत्र्यांच, तर दुष्काळात मदतीची जवाबदारी स्वीकारली मनसेने

MNS, Raj Thackeray, Devendra Fadanvis, Loksabha Election 2019

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील दत्तक घेतलेल्या त्रंबकेश्वर येथील बर्डेवाडी (खोडाला तालुका) येथील दुष्काळामुळे ओढवलेलं वास्तव लाव रे तो व्हिडिओ म्हणत जनतेसमोर मांडलं होतं. दरम्यान या गावातील महिला चक्क खोलवर विहिरीत उतरून हंडाभर पाण्यासाठी जीव मुठीत टाकत असल्याचं वास्तव अनेक वृत्त वाहिन्यांच्या विशेष वृत्तात समोर आलं होतं.

मात्र प्रचाराच्या शेवटच्या दिवशी स्वतःला महान दाखवण्यासाठी राज ठाकरे यांना प्रतिउत्तर देण्यासाठी भाजपने केविलवाणा प्रयत्न केला खरा, मात्र सत्ताधारी म्हणून कोणतीही जवाबदारी त्यांनी स्वीकारली नाही. त्यात मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी कधी शिवाजी पार्क येथील झाड तरी दत्तक घेतलं होतं का, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला होता. मात्र जमिनीवर त्याच राज ठाकरे यांचा मनसे पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावाची जवाबदारी दुष्काळ काळात स्वीकारत आहेत.

२६ एप्रिलला नाशिकच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील बर्डेवाडी खोडाला गाव जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले दाखवले आणि त्या गावातील महिला हंडाभर पाण्यासाठी कशा वणवण फिरतायत आणि जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी काढतानाचे व्हिडिओ दाखवले आणि मुख्यमंत्रीची फसवेगिरी जनतेसमोर मांडली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे सरचिरणीस आणि कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांना या गंभीर विषयात लक्ष देण्याचे आदेश दिले. त्यानंतर २००० लिटरच्या टाक्या आणि पाण्याचे टँकर्स १ मे २०१९ पासून ते पाऊस पडे पर्यंतची जवाबदारी त्यांनी स्वकारली आणि प्रत्यक्ष कामाला लागले. त्यानुसार सरचिटणीस मनोज चव्हाण यांच्याकडुन गावात सर्व सामुग्री पोहोचण्यास सुरुवात झाली आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x