नवी दिल्ली : २०१४ पासून मी नरेंद्र मोदींच्या प्रचारात सतत कार्यरत होतो. नरेंद्र मोदी यांनी सामान्य लोकांना इतकी खोटी आश्वासनं दिली की, ती आश्वासनं केवळ निवडणुकीतील “जुमला” ठरल्याने लोकं मोदींचा सर्व राग माझ्यावर काढायचे असा रोजचा अनुभव झाला होता. दरम्यान, पंतप्रधान झाल्यावर मोदींनी ओळख दाखवणं सुद्धा बंद केले तसेच अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा कधीच उत्तर मिळाले नाही. त्यावेळी त्यांच्या घमंडी स्वभावाचा मला सुद्धा अनुभव आला. ते लोकांना केवळ स्वतःच्या वेळेपुरता वापरून घेतात आणि काम झाल्यावर दुर्लक्ष करतात हे मी खात्रीने सांगतो असे ते म्हणाले.
दरम्यान, अभिनंदन पाठक असं नाव असलेले हे गृहस्थ मोदींना कंटाळून अखेर काँग्रेसमध्ये गेले असून आता आगामी निवडणुकीत ते काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच मोदींनी सामान्यांना दाखवलेलं अच्छे दिन’च स्वप्न खोटं असून ‘अच्छे दिन’ कधीच येणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे देशात पुन्हा काँग्रेस सत्तेत येणे गरजेचे आहे असं ते म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली असून यापुढे ते काँग्रेससाठी प्रचार करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लवकरच अभिनंदन पाठक हे मोदींच्या विरोधात प्रचार करणार असल्याने प्रसार माध्यमाच्या केंद्रस्थानी असतील असं चित्र आहे.
