25 September 2023 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks to Buy | साउथ इंडियन बँकेचा शेअर 26 रुपयाचा, पण 6 दिवसात 13.50 टक्के परतावा दिला, आता 15 टक्के कमाई करा Tata Power Vs GMR Power Share | कोणता शेअर पॉवर दाखवेल? या शेअरने 1 महिन्यात 74% परतावा दिला, कोणता शेअर आहे स्वस्त? Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे टॉप 5 शेअर्स मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, फायद्याची यादी सेव्ह करा Mangal Ketu Yuti | या आहेत त्या 3 भाग्यवान राशी, मंगळ-केतूच्या युतीने नशीब फळफळणार, अत्यंत फायदेशीर काळ, तुमची राशी आहे? HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर! हिंदुस्तान एरोनॉटिक्स स्टॉक स्प्लिट होणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या उच्च शिक्षित RBI चीफ उर्जित पटेल यांना पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप म्हणाले होते पीएम मोदी, माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक दावा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! अपेक्षेपेक्षा अधिक मिळू शकते महागाई भत्ता आणि पगार वाढ, महत्वाची अपडेट्स
x

सेनेच्या डझनभर मंत्र्यांची सत्तेत कामगिरी तरी काय? आता पुन्हां एकहाती सत्ता?

मुंबई : सध्या भाजपसोबत केंद्रात आणि राज्यात सत्तेत सामील असलेली शिवसेना आणि त्यांच्या डझनभर मंत्र्यांनी त्यांच्या अखत्यारीतील खात्यांमार्फत राज्यातील जनतेसाठी कोणती विकासाची कामं केली ते माहित नसल्याने शिवसेना हळुवार पणे भावनिक मुद्यांकडे वळत असल्याचे चित्र आहे. आज शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन असल्याने, मुंबईतील गोरेगावमध्ये शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

आज कार्यकर्त्यांना संबोधित करताना युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा स्वबळाचा नारा दिला आहे. परंतु मिळालेल्या सत्तेचा महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणता उपयोग केला याबद्दल त्यांनी कोणताही शब्द काढला नाही.

आपण कोणाच्याही जीवावर मोठे झालेलो नाही तसेच शिवसेना संपूर्ण देशभर पोहचवायची आहे असं उपस्थितीतांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले. आधी ८० टक्क्यावर असलेलं शिवसेनेचं समाजकारण हे आदित्य ठाकरेंनी थेट १५० टक्क्यांवर गेलं असल्याचा दावा केला. परंतु सत्तेतील सहभागी शिवसेनेच्या डझनभर मंत्र्यांनी मागील ४ वर्षात किती टक्के विकासाची तसेच पायाभूत सुविधांची कामं राज्यातील जनतेसाठी केली याचा कोणताही आकडा त्यांनी सादर केला नाही.

मुळात पक्षाने आयोजित केलेली रक्तदान शिबीर किव्हा इतर उपक्रम हे वेगळे विषय असतात. परंतु आपल्या राज्यातील व केंद्रातील १२-१३ मंत्र्यांनी प्रशासनातून महाराष्ट्रातील जनतेसाठी कोणत्या राज्यस्तरीय पायाभूत सुविधा उभारून जनसेवा केली याचा कोणताही आकडा पक्षाकडे नसावा, त्यामुळे सध्या भावनिक मुद्याकडे लक्ष वळविण्याचे कार्यक्रम सुरु असल्याचं एकूणच चित्र आहे.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x