नाशिक : सध्या युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या आलिशान गाडीला मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळ खड्ड्यांमुळे फटका बसला असून त्यांच्या रेंजरोव्हर गाडीचे टायर फुटले. गुरुवारी मध्य रात्री ही घटना घडल्याचे समजते.
प्रथम दर्शनी ही घटना किरकोळ असल्याचं समजत, तसेच त्यात कोणालाही दुखापत झाली नसून सर्वजण सुखरूप असल्याचं स्वतः आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून कळवलं आहे. परंतु या घटनेनंतर आदित्य ठाकरेंसाठी दुसऱ्या गाडीची सोय करून ते पुन्हा मालेगावच्या दिशेने रवाना झाले.
राज्यभर निरनिराळ्या मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य माणसाला हा रोजचाच अनुभव असतो. पण हाच अनुभव केंद्रात तसेच राज्यात सत्तेत असलेल्या नेत्यांना आल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.
