नवी दिल्ली : सध्या देशभर #MeToo मोहीम जोर धरत असताना भाजपचे खासदार उदित राज यांनी आज ट्विट करून #MeToo मोहीम थांबवा असे अप्रत्यक्ष म्हटले आहे. समाज माध्यमांद्वारे जोर धरणाऱ्या या मोहिमेवर खासदार उदित राज यांनी काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले आहेत.

भाजपाचे खासदार उदित राज यांनी आज ट्विट करून #MeToo मोहीम थांबवा असे म्हटले आहे. उदित राज ट्विटमध्ये म्हणतात, #MeToo जरुरी आहे, परंतु तब्बल १० वर्षांनंतर असे आरोप करण्यात काय अर्थ आहे? इतक्या वर्षांनी त्याची सत्यता कशी पडताळणार? आणि ज्याच्यावर खोटे आरोप होतील, त्याच्या आयुष्यावर किती परिणाम होईल? याचा विचार करायला हवा. परंतु जे सुरु आहे ते थांबवणे गरजेचे आहे असं त्यांनी मत व्यक्त केलं आहे.

BJP MP Udit Raj says to stop MeToo campaign in India