लखनौ : आगामी लोकसभा निवडणुकीत यूपीत मोठी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मागील लोकसभा निवडणुकीत बसपा आणि सपामध्ये मोठी मत विभागणी झाल्याने त्याचा थेट फायदा भाजपला झाला होता. परंतु, यंदा वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. कारण आजच्या मायावती आणि अखिलेश यांच्यामधील संयुक्त पत्रकार परिषदेतून भाजपची डोकेदुखी वाढणार आहे हे निश्चित दिसते.
आजच्या या राजकीय बातमीने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची चिंता शंभरपट वाढली आहे. दरम्यान, या आघाडीत सपा- बसपाने काँग्रेसला स्थान दिलेले नाही. परंतु, रायबरेली आणि अमेठी या काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघात सपा किंवा बसपा स्वतःचा उमेदवार देणार नाहीत, असे मायावतींनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
लखनौतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आज दुपारी अखिलेश यादव आणि मायावती यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेस तसेच भाजपावर या दोन्ही प्रमुख पक्षांवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसच्या काळात देशात घोषित आणीबाणी होती, तर भाजपच्या काळात देशात अघोषित आणीबाणी आहे, अशी जळजळीत टीका त्यांनी यावेळी केली.
पुढे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या की, काँग्रेस- भाजपाची अवस्था समान आहे, दोन्ही सरकारच्या कार्यकाळात घोटाळे झाले आहेत, काँग्रेसच्या काळात त्यांना बोफोर्स घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागली होती, तर आता भारतीय जनता पक्षाला राफेल घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागेल, असा दावा मायावतींनी यावेळी बोलताना केला. तसेच भविष्यात काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, आम्ही काँग्रेससोबत गेल्याने नेहमी त्यांचा फायदा झाला, परंतु आम्हाला यातून काहीच मिळाले नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मायावतींना पाठिंबा देताना स्पष्ट केले की, ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने मायावतींवर आक्षेपार्हटिपणी केली होती, तेव्हाच महाआघाडीची पायाभरणी झाली होती. कारण मायावतींचा अपमान हा माझा अपमान होता असे अखिलेश यादव यांनी स्पष्ट सांगितले. दरम्यान, भविष्यात पंतप्रधानपदासाठी मायावतींना पाठिंबा देणार का, या प्रश्नाचे सुद्धा अखिलेश यादव यांनी सूचक उत्तर दिले आणि उपस्थितांमध्ये हशा पिकली. ते प्रश्नाला उत्तर देताना म्हणॆ की, आम्ही कोणाला पाठिंबा देणार हे सर्वांनाच माहित आहे
युपीमध्ये लोकसभेच्या तब्बल ८० जागा असून बहुजन समाज पार्टी ३८ आणि सपा ३८ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी रायबरेली आणि अमेठी या २ मतदारसंघात काँग्रेसविरोधात आम्ही उमेदवार देणार नाही, असे सुद्धा मायावतींनी सांगितले. तर उर्वरित जागा आमच्या महाआघाडीत सामील होणाऱ्या अन्य छोट्या पक्षांसाठी सोडल्या आहेत, हे त्यांनी नमूद केले.
समाजवादी पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष श्री अखिलेश यादव जी एवं बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष बहन कु॰ मायावती जी की संयुक्त प्रेसवार्ता। pic.twitter.com/sumDhbOzVF
— Samajwadi Party (@samajwadiparty) January 12, 2019
समाजवादी पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष श्री अखिलेश यादव जी एवं बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष बहन कु॰ मायावती जी की… https://t.co/x4h72V3hDT
— Samajwadi Party (@samajwadiparty) January 12, 2019
