यवतमाळ : आधीच ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण नंतर रद्द केल्यामुळे वादात अडकलेल्या यवतमाळ येथील ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज रविवारी सायंकाळी समारोप झाला. दरम्यान, उपस्थित मान्यवरांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समारोपाच्या भाषणात राज्य सरकारचे चांगलेच खडे बोल सुनावले आणि राजकारण्यांना दोन मोलाचे सल्ले दिले.

ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण नंतर पुन्हा रद्द करण्याच्या निर्णयामुळे मोठं राजकीय वादंग निर्माण झालं होतं. त्याच वादाचा धागा पडकून नितीन गडकरी यांनी साहित्यिक तसेच राजकारण्यांना सुद्धा अप्रत्यक्ष समंजस पणाचे सल्ले दिले.

दरम्यान, उपस्थितांशी बोलताना ते म्हणाले, “राजकारण्यांनी साहित्य तसेच सांस्कृतिक संस्थांमध्ये अजिबात हस्तक्षेप करू नये. तसेच राजकारण्यांना सुद्धा सांस्कृतिक व्यासपीठ वर्जही असता कामा नये. मतभेद असायला अजिबात हरकत नाही, परंतु त्यांचे मनभेद असता कामा नये. कारण साहित्यिक हे आपल्या समाजाचे मार्गदर्शक असतात, असं सुद्धा ते म्हणाले.

central cabinet minister nitin gadkari speech in marathi sahitya samelan at yavatmal