20 April 2024 6:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

२०१९ मध्ये राजकीय परिस्थिती बदलण्यास वातावरण अनुकूल: शरद पवार

सातारा : भाजपचा मागील ४ वर्षातील कारभार बघता सामान्य जनतेत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे कोणाला नक्की किती जागा मिळतील किंव्हा सरकार बनेल की नाही हे सध्या सांगण कठीण असलं तरी २०१९ मध्ये राजकीय परिस्थिती बदलण्यास वातावरण अनुकूल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार म्हणाले.

साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची ५९ वी पुण्यतिथी असल्याने शरद पवारांची विशेष उपस्थिती होती. २०१९ मधील निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी अन्य पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. काँग्रेस सोबतच्या आघाडीबाबत शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, ‘राज्यासह केंद्रात काँग्रेससोबत एकत्र काम करण्याची आमची इच्छा आहे. सध्या राज्यात काँग्रेसची ताकद कमी झाली असली तरी देशातील अनेक राज्यात काँग्रेसचे अस्तित्व अजून कायम आहे, ते आपण मान्य केले पाहिजे असं मत त्यांनी नोंदवलं.

भाजप कृषी संशोधन केंद्रांतील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भाजप सरकार भरत नाहीत यावर शरद पवारांनी नेमकं बोट ठेवलं. तसेच राज्यात अनेक संस्थांना प्रमुख नेमलेच नाहीत असं पवार म्हणाले. तसेच देशाच्या संसदीय लोकशाहीत लोकांच्या मनातील संशय दूर करणे हे भारताच्या निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य त्यांनी चोखपणे बजावले तरच ते लोकशाहीच्या हिताचे असेल असं मत निवडणूक आयोगाच्या भुमिकेबाबत बोलताना पवार यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केलं.

तसेच महाराष्ट्रात भाजप सरकार सर्वत्र मराठीचा वापर करण्याबाबतचा परिपत्रक काढत, परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत भाजप सरकार कोणत्याच हालचाली करीत नसल्याच मत पवारांनी मांडल. तसेच धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याबाबतचे भाजपचे आश्वासन हवेतच विरळ आहे असं पवार म्हणाले.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x