नवी दिल्ली: भारतीय वायूदलाने २६ फेब्रुवारी मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ला करून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान, पाकिस्तानी लढाऊ विमानांवर हल्ल्या करताना विंग कमांडर अभिनंदन यांनी महत्वाची जवाबदारी आणि बहाद्दुरी दाखवली होती. तसेच पाकिस्तानच्या प्रतिऊत्तरात त्याचे मिग २१ लढाऊ विमान कोसळेल, परंतु ते पॅराशूटच्या साहाय्याने खाली आले मात्र दुर्दैवाने पाकिस्तानच्या हद्दीत पडले आणि त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतलं.
परिस्थिती चिघळलेली असताना आणि आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला. विंग कमांडर अभिनंदन देशात वाघा सीमेवरून सुखरूप परतले, मात्र त्यानंतर त्यांच्या शौर्याचा सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या मतपेटीसाठी वापर सुरु केल्याचे समोर येत आहे.
भाजपचे नेते थेट विंग कमांडर अभिनंदन यांचे फोटो गाड्यांवर लावून आणि भाजपचे झेंडे त्यावर सजवून मोदी अगेनचे नारे देत आहेत. विशेष म्हणजे त्यावरील शोषवाक्यात देखील विंग कमांडर अभिनंदन यांचा वापर सुरु केला आहे. त्यावर लिहिण्यात आलं आहे की “अभिनंदन तेरा वंदन है. मोदी है तो मुमकिन है. नमो अगेन. त्यामुळे भाजप आगामी निवडणुका लष्कराच्या जवानांच्या नावाचा वापर करून लढवणार हे निश्चित आहे.
निर्लज्जता की सबसे उच्चतम पराकाष्ठा ऐसी होती है।@SanjayAzadSln pic.twitter.com/KL3WwjYqjl
— Dr Chhavi Yadav (@ChhaviDr) March 3, 2019
