मुंबई : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाने भीषण परिस्थिती ओढवली आहे. नापिकीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असून तो आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.

दरम्यान, दुष्काळ, कर्जमाफी, वीज या अनेक कारणाने राज्यातील शेतकरी बेहाल झाले आहे. त्यात सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने अनेक जण समस्या घेऊन मंत्रालयावर धडक देत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज दत्तू माळी बाभूळगाव तालुका पंढरपूर या शेतकऱ्याने विधानभवनाच्या गेटजवळ आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांना त्याच्या हालचाली त्वरीत नजरेस पडल्याने त्याला काही घडण्याच्या आधीच ताब्यात घेण्यात आले आहे.

Farmer attempt suicide near maharashtra assembly in Mumbai