25 April 2024 3:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

बेरोजगार युवक मोदींच्या २ कोटी रोजगाराची आतुरतेने वाट बघत आहेत : डॉ. मनमोहन सिंग

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या ‘शेड्स ऑफ ट्रूथ- ए जर्नी डिरेल्ड’ पुस्तकाचे प्रकाशन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते काल करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या अनेक आश्वासनांचे वाभाडे काढले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या अनेक फसव्या घोषणांना उजाळा दिला.

त्यावेळी बोलताना डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन कोटी रोजगार देऊ, युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु ते हवेत विरले का? बेरोजगार युवक २ कोटी रोजगाराची खूप आतुरतेने वाट पहात आहेत, असा टोला लगावला. मागील ४ वर्षात रोजगाराच्या संधी वाढण्याऐवजी त्या अधिक प्रमाणात घटल्या आहेत. आम्ही रोजगाराच्या, नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या असे नरेंद्र मोदी सरकारकडून सांगण्यात येत असले तरी सुद्धा त्यात अजिबात तथ्य नसल्याचे डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

तसेच ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोलताना डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’, स्टँड अप इंडिया यांसारख्या योजनांचा हवा तसा सकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. केवळ घाईने घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या आणि जीएसटी लागू करण्याच्या निर्णयामुळे आर्थिक आघाडीवर देशातील उद्योग क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे अशी जाहीर टिपणी सुद्धा त्यांनी केली आणि मोदी सरकारच्या विविध योजनांचे वाभाडे काढले.

विद्यमान कृषी व्यवस्थेवर बोलताना मनमोहन सिंग म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात देशातल्या शेतकऱ्यावर दुर्दैवाने अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे. कारण या मोदी सरकारचे कृषी विषयक धोरण शेतकऱ्यांना पुरक असे ठरू शकलेले नाही. लोकसभा निवडणुकांच्या आधी मोदींनी जी आश्वासने दिली होती त्यातील कोणतेही आश्वासन या सरकारने पूर्ण केलेली नाहीत, अशीही जळजळीत टीका त्यांनी उपस्थितांसमोर बोलताना केली.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x