25 April 2024 11:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
x

अफझल खान सरकारला अजून ५ वर्ष देऊन बघू - उद्धव ठाकरे एवढे का नरमले?

Uddhav Thackeray, devendra fadnavis, amit shah, shivsena and bjp maharashtra

स्वतःला शिव-शंभूंचे अवतार मानून अफझल खानाचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे पूर्वीचे उद्धव ठाकरे आणि सध्या भाजपच्या हातात हात घालून त्यांचे गोडवे गाणारे उद्धव ठाकरे हे मराठी माणसांना रुचण्यासारखं नक्कीच नाही. उद्धव ठाकरेंनी युतीची घोषणा करताच भाजप पुढे शड्डू ठोकून उभा असलेला सामान्य शिवसैनिक मात्र मातोश्री आदेशानंतर बुचकाळ्यात पडला आहे. सामान्य शिवसैनिकांना बाळासाहेबांची शपथ देऊन आणि वचन घेऊन उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा शंख वाजवला खरा परंतु असे काय नेमके घडले कि त्यांना भाजप सोबत युती करावी लागली?

खरंतर उद्धव ठाकरे म्हणजे सय्यमी तसेच चाणाक्ष अशी त्यांची ओळख, योग्य वेळेस योग्य निर्णय घेणे हि त्यांची खुबी. मोदिनामाचा सूर हळू हळू ओसरत असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी भाजपवर नेहमीच आगपाखड केली. परंतु याच मोदी लाटेत त्यांचे कधीही निवडून न येऊ शकणारे नेते खासदार आणि आमदार झाले. परंतु राजस्थान आणि मध्य प्रदेश मध्ये भाजपचा पराभव पाहता भाजपवर कुरघोडी करणे शिवसेनेला थोडे सोपेच झाले होते. महाराष्ट्रात आम्हीच मोठा भाऊ म्हणून मिरवणारे संजय राऊत हे कधीच जनतेतून निवडून गेले नाहीत आणि भाजप सोबत युती झाल्याबरोबर त्यांच्यासाठी तर अफझल खान अगदी जवळचा झाला.

परंतु १ प्रश्न मात्र सर्वसामांन्यांच्या मनात घर करून बसला आहे आणि तो म्हणजे काल पर्यंत भाजपला पाण्यात पाहणारे आणि एकमेकांवर यतेच्छ आरोप करणारे यांच्यात दिलजमाई झाली तरी कशी? भाजपने असा काय डाव साधला कि उद्धव ठाकरे युतीसाठी तयार झाले आणि एके काळी त्यांना वाटत असणारा अफझलखान आता अचानक प्रिय झाला.

काही जाणकारांच्या मते भाजपने उद्धव ठाकरेंना ई.डी. ची भीती दाखवत युती साठी तयार केलं. आणि तशीही त्यांची युती करतानाची पत्रकार परिषदेतील देहबोली बरंच काही सांगून जात होती. आम्ही मराठी माणसांच्या इच्छेने युती करत आहोत अशी बतावणी उद्धव ठाकरेंनी केली, परंतु युतीमुळे तर सर्वात जास्त सर्वसामान्य शिवसैनिक दुखावला तर मराठी माणसंच काय? कि उद्धव ठाकरे मराठी माणसांना गृहीत धरायला लागले आहेत? तसेही सध्या शिवसेनेचे नवीन ब्रीदवाक्य म्हणजे “उत्तर भारतियोंके सम्मान मे, शिवसेना मैदान मे” असेच काहीसे आहे.

शेवटी काय तर सामान्य मराठी माणसाला कोणी वाली नाही आणि आजतागायत त्याला सगळेच गृहीत धरत आले आहेत आणि त्यात मोठी चूक हि याच मराठी माणसाची आहे. परंतु आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी सत्तेला लाथ मारून स्वबळावर निवडणूक लढवली असती असा सूर मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांवर उमटू लागला.

१ मार्च मराठी भाषा दिनाच्या दिवशी एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले “५० वर्ष काँग्रेसला सत्ता दिली आता अजून ५ वर्ष मोदींना सत्ता देऊन बघु”. त्यांच्यामते चौकीदार चोर होता आणि आता अचानक चौकीदार थोर झाला. परंतु पाणी कुठेतरी नक्कीच मुरतंय.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x