लखनऊः यूपीतल्या मुजफ्फरनगरमधल्या एका भारतीय जनता पक्षाच्या आमदारानं वादग्रस्त आणि वादग्रस्त विधान केलं आहे. देशात ज्या लोकांना असुरक्षित वाटते, त्यांना तर बॉम्बनं उडवून दिलं पाहिजे, अशी विक्रतु प्रतिक्रिया देताना मुक्ताफळे उधळणारे हे महाशय भारतीय जनता पक्षाचे मुजफ्फरनगरमधले आमदार विक्रम सैनी आहेत.
पुढे बोलताना, ‘परंतु हे माझं वैयक्तिक मत असल्याचं सुद्धा त्यांनी उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. आमदार सैनी म्हणाले, मला व्यक्तिगतरीत्या वाटतं की, जे लोक सांगतात भारतात त्यांना भीती वाटते किंवा ज्यांना भारतात असुरक्षित वाटते, अशा लोकांना बॉम्बनं उडवून दिलं पाहिजे.
इतकंच नाही तर माझ्याकडे एखादं मंत्रालय दिल्यास अशा सर्वच माणसांना मी बॉम्बनं उडवून देईन. कोणालाही सोडणार नाही, अशी विकृत टिपणी सुद्धा त्यांनी केली आहे.
#WATCH Vikram Saini, BJP MLA from Muzaffarnagar says ‘My personal view is that those who say they feel unsafe and threatened in India should be bombed, give me a ministry and I will bomb all such people, not even one will be spared’ pic.twitter.com/E9yWNH7MBF
— ANI UP (@ANINewsUP) January 4, 2019
