मुंबई : आज मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जवळ जवळ ७० हजार इतकी मतदार निंदणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे यंदा चौरंगी लढती पाहावयास मिळणार आहेत.
मुख्य लढती या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत असली तरी काँग्रेस- राष्ट्रवादी- शेकाप यांची पुरोगामी आघाडी तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सुद्धा यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने लढतीत रंगत आली आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण ५४ मतदार केंद्र उभारण्यात आली आहेत. सुरक्षेच्या कारणामुळे जवळपास २ हजाराहून अधिक पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
