28 March 2023 2:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Khadim India Share Price | या कंपनी व्यवस्थापनतील फेरबदलांमुळे हा शेअर फोकसमध्ये आला, गुंतवणूक करावी का? Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या
x

त्या जमिनीसाठी अवनीची हत्या? अनिल अंबानींसाठी देश विकायला काढला आहे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळ येथे अवनी वाघिणीला ठार केल्याच्या प्रकरणावरुन फडणवीस सरकार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. अवनी वाघिणीला ठार करण्याऐवजी तिला बेशुद्ध करायला हवं होतं, असं म्हणत राज ठाकरे यांनी अवनी वाघिणीला ठार करण्याचा निर्णय योग्य नव्हता असं म्हटलं आहे. केवळ पुतळे उभारुन देशभरात वाघांचं संवर्धन होऊ शकत नाही, असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हीच गोष्ट जर गुजरातमध्ये सिंहांच्या बाबतीत झाली असती तर काय गोंधळ झाला असता, असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला. शिवाय, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार अतिशय बेफिकीरपणे उत्तरं देतात. आणि ते वनमंत्री आहेत म्हणजे त्यांनी सर्वच समजतं असं मानण्याचं कारण नाही. त्यामुळे उद्या त्यांचं वनमंत्रिपद सुद्धा जाऊ शकतं, असे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, ज्या वाघिणीला यवतमाळ येथे ठार करण्यात आले आहे, तेथे सरकार अनिल अंबानींना जमीन देणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे अनिल अंबानींसाठी संपूर्ण देश विकायला काढला आहे, असा अत्यंत गंभीर आरोप सुद्धा मनसे अध्यक्षांनी केला आहे.

विशेष म्हणजे अवनी वाघिणीला ठार मारल्यानंतर तिचे २ बछडे सुद्धा अनाथ झाले आहेत. एका जिवाला ठार केल्यानंतर आणखी २ जिवांना सरकारने मारल्याचं चित्र आहे. या सरकारला एकूणच सत्तेचा माज आला आहे. आणि आम्ही काही सुद्धा केलं तरी सगळं सहन केलं जाते, अशी त्यांची मानसिकता तयार झाली आहे. पण आता घोडा मैदान जवळ आहे, त्यामुळे सरकारला लवकरच कळेल आणि जनताच त्यांना धडा शिकवेल असं राज ठाकरे म्हणाले.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x