मुंबई : सध्याची जीवघेण्या स्पर्धेमध्ये गुंतलेली शिक्षणपद्धती पालकांसोबतच विद्यार्थ्यांसाठी मोठं आवाहन ठरली आहे. याच शिक्षणपद्धतीत पालक आणि विद्यार्थी दोघेही सारखेच भरडले जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस पालक आणि विद्यार्थीदेखील ताणतणावाखाली आयुष्य जगताना सहज नजरेस पडतं. परंतु, शिक्षण म्हणजेच आयुष्य आहे का? ही विचार करायला लावणारी गोष्ट आज प्रत्येक घराशी निगडित आहे.

त्यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे यांनी “आता बोलायलाच हवं!” या शीर्षकाखाली एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी शिक्षणाचं आयुष्यात महत्व असल्याचं अधोरेखित करताना, केवळ शिक्षणच आयुष्य नाही हे पटवून देण्यासाठी पालक आणि विध्यार्थ्यांशी त्यांनी या व्हिडिओ मार्फत सुसंवाद साधला आहे. त्यानिमित्त त्यांनी जगातील अनेक मोठ्या उंचीवर पोहोचलेल्या व्यक्तिमत्वांचा दाखला दिला आहे. शिक्षणाचं महत्व नक्कीच असल्याचं सांगताना शिक्षणच आयुष्य नाही हे समजावताना, पालक-विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश त्यांनी या संवादातून दिल्याचे समजते.

आता बोलायलाच हवं! या शीर्षकाखालील व्हिडिओ मध्ये नक्की काय म्हटलं आहे अभिजित पानसे यांनी?

mns leader abhijit panse release video on education parents and students