ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा मोठा दिलदारपणा समोर आला आहे. नवी मुंबईमधील शर्ट कंपनीच्या कामगारांना थकीत पगार दिवाळीपूर्वी मिळवून देणार असं आश्वासन अविनाश जाधव यांनी कामगारांना दिलं होतं. परंतु नेमकं दिवाळीच्या तोंडावर कंपनी मालकाने दगा दिला आणि अजून थोडा वेळ द्या असा रेटा कामगारांकडे आणि मनसेच्या शिष्टमंडळाकडे पुढे केला. परंतु मालकाच्या या वागण्यामुळे शेकडो कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांचे पडलेले चेहरे उपस्थितांना जाणवत होते. कारण भर दिवाळीत पगारा अभावी रिकामा खिसा अशी कामगारांची अवस्था अविनाश जाधवांच्या नजरेस पडली आणि कामगारांनी ती कुरबुर कंपनीच्या मालकांसमोर सुद्धा व्यक्त केली.

परंतु, कामगारांना स्वतः दिलेला शब्द वाया जाऊ नये आणि या शेकडो कुटुंबीयांची दिवाळी कडू होऊ नये म्हणून अविनाश जाधव यांनी स्वतःच्या खिशातून सर्व कामगारांना २५ लाख रुपयांच्या पगाराचे वाटप केले आणि त्यानंतर कामगारांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळालं. परंतु, अविनाश जाधवांच्या या दिलदार पणाला त्या शेकडो कामगारांनी लाख मोलाचे आशीर्वाद सुद्धा दिले. विशेष म्हणजे, कामगारांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना इतर कोणत्याही पक्षांपेक्षा मागील अनेक महिन्यापासून उजवी होताना दिसत आहे.

शर्ट कंपनीच्या मालकांनी काही कारणास्तोव पैसे देता आले नाही, परंतु कामगारांची दिवाळी तर दुःखात जाणार हे स्वीकारण्यापेक्षा त्यांनी कामगारांना स्वतःच दिलेलं वचन मोडू नये आणि कामगारांची दिवाळी खराब होऊ नये म्हणून खिशातून २५ लाख खर्च करत सर्व कामगारांना २५ लाख रुपयाचं पगार वाटप करून दिवाळीच्या शुभेच्या सुद्धा दिल्या.

MNS leader Avinash Jadhav distributed 25 lakhs from his own pocket to t shirt company labours from navi mumbai