3 May 2025 12:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मनसेचा औरंगाबादमध्ये दंडुका मोर्चा, नंतर राज्यव्यापी स्वरूप

मुंबई : महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागात मोठा दुष्काळ पडला आहे. परंतु, राज्यातील युती सरकार शेतक-यांच्या सर्व प्रश्नांकडे पूणर्पणे दुर्लक्ष करत आहे. त्यासाठी आता राज्य सरकारचे डोके ठिकाणावर आणण्याची गरज असल्याने हातात दंडुका घ्यायला लागणार असल्याचा आक्रमक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजच्या पत्रकार देण्यात आला आहे. फडणवीस सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना २७ नोव्हेंबरला औरंगाबादमध्ये प्रचंड मोठा दंडुका मोर्चा काढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर या मोर्चाला राज्यव्यापी स्वरूप येईल, अशी माहिती मनसे नेते शिरीष सावंत यांनी प्रसार माध्यमांना दिली.

आज दुपारी राजगड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मनसे सरचिटणीस अनिल शिदोरे, नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे कसे दुर्लक्ष करत आहे, याची माहिती पत्रकारांना दिली. फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वी विविध तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती असल्याचे अधिकृतपणे जाहिर केले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी तालुक्यात केवळ दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहिर न करता थेट “दुष्काळ” जाहिर करावा अशी मागणी विरोधकांकडून होऊ लागली आहे.

दरम्यान, फडणवीस सरकारने दुष्काळसदृश्य परिस्थिती जरी जाहिर केली असली तरी त्यावर कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप मनसेने आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. राज्यातील अनेक भागात दुष्काळ जाहिर करून सुद्धा फडणवीस सरकारकडून योग्य उपाययोजना राबवल्या जात नसल्याने बळीराजा अजून संकटात ढकलला जात असून, त्यांच्यामध्ये सरकार विरोधात संतापाची लाट आहे असं मनसेने निदर्शनास आणून दिले आहे.

तसेच दुष्काळ परिस्थितीची कोणतीच माहिती सध्या सरकारकडे नाही. खरीप हंगाम असतानाच सर्व गोष्टींची कल्पना राज्य सरकारने शेतकऱ्यांना देणे गरजेचे होते. परंतु, राज्य फडणवीस सरकार याची कोणतीही माहिती देत नसल्याची खरमरीत टिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्रकार परिषदेत केली आहे. आणि त्यासाठीच झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी २७ नोव्हेंबरला औरंगाबादमध्ये दंडुका मोर्चा काढण्यात येईल. तसेच त्यानंतर पक्षातर्फे राज्यव्यापी मोर्चे काढले जातील. दरम्यान, ज्या तालुक्यात शेतक-यांना दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, अशा तालुक्यात मनसेकडून भव्य मोर्चे काढण्यात येतील असे सावंत यांनी स्पष्ट केले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या