मुंबई : गोवंडीमधील एका महापालिका शाळेतील १४० विद्यार्थ्यांना औषधातूनच विषबाधा झाली आहे. त्यात दुर्दैवाने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आरोग्य केंद्रातून हे औषध देण्यात येत. गोवंडी येथील संजय नगर मध्ये एक उर्दू माध्यमाची शाळा आहे तिथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.
या उर्दू महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना कॅल्शियम आणि रक्तवाढीची औषधं दिली जात होती. त्यांना ६ ऑगस्ट रोजी ही औषधं दिली होती. या औषधांमुळेच ती रिअॅक्शन झाल्याचं तज्ज्ञ बोलत आहेत. यात उपचारादरम्यान चाँदनी शेख हीचा मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळं पालकांमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण असून महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक नगरसेवक रईस शेख यांनी ही विषबाधा नक्की खिचडी खाल्ल्यामुळे झाली आहे की खिचडी खाल्यानंतर घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांमुळ याची चौकशी करण्यात यावी असं म्हटलं आहे.
