मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, नोकरदार, मध्यमवर्गीय, यांना मोठा दिलासा देण्यात आल्याचं मोदींनी म्हटलं आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे हे #AakhriJumlaBudget असल्याची टीका विरोधकांसह नेटीझन्सनी केली आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकरी तसेच सामान्य लोकांची निवडणुकीआधी शुद्ध फसवणूक केली असल्याची टीका केली जात आहे. तसेच विरोधकांच्या टीकेसोबतच या बजेटला समाज माध्यमांवरील नेटिझन्सकडून #AakhriJumlaBudget असे नामकरण करण्यात आले आहे. नेटीझन्सनी फेसबूक आणि ट्विटरच्या माध्यामातून मोदींच्या अंतिम अर्थसंकल्पावर मिम्स बनवत खिल्ली आहे.

narendra modi governments akhri jumla budget is trending on social media