नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरुन काँग्रेसनं भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काळ्या यादीत असणाऱ्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला “मेक इन इंडियात” का सामील करुन घेतलं असा सवाल काँग्रेसच्या थेट पत्रकार परिषदेत उपस्थित केला आणि भाजप तोंडघशी पडल्याचे समजते.

शनिवारी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारातील दलाल ख्रिश्चन मिशेल याला पटीयाळाच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. मिशेलनं चौकशीदरम्यान काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींचं नाव घेतलं असा आरोप सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) वकिलांनी न्यायालयात केला होता. त्यानंतर काल राष्ट्रीय काँग्रेसने जाहीर पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि नरेन्द्र मोदींना तोंडघशी पडल्याची चर्चा सध्या दिल्लीच्या राजकारणात रंगली आहे.

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करून भाजपला कोंडीत पकडले आहे. दरम्यान, ते पत्रकार परिषदेत म्हणाले की, “काळ्या यादीतील कंपनी ऑगस्टा वेस्टलँडमध्ये मोदीजीच खरे ‘दामदार’ आहेत. ईडीच्या साह्याने मोदी सरकार काँग्रेसचे नाव खराब करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. तसेच मोदीजींच्या राज्यात ‘ईडी’ आता Embarrassing Disaster बनली आहे आणि ‘चौकीदार’च खरा ‘दागदार’ असे सुद्धा ते प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

दरम्यान, ईडीने शनिवारी केलेल्या दाव्यानुसार, ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये देशाचा चौकीदारच खरा दागदार आहे. ऑगस्टा वेस्टलँडला मोदी सरकारने काळ्या यादीतून बाहेर का काढले? ह्याचे उत्तर मोदी सरकारने द्यावे. आणि जर मोदी सरकारने हे स्पष्ट केले नाही तर याचे परिणाम त्यांना नक्कीच भोगावे लागतील. कारण २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव अटळ आहे. त्यानंतर आम्ही यावर चौकशी समिती नेमून संबंधित दोषींना शिक्षा देण्याचे काम करू, असे सुद्धा त्यांनी ठणकावले आहे.

national congress attacked on narendra modi govt surjewala ask why agusta out blacklist