26 April 2024 8:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

काँग्रेस व एनसीपी'ची आघाडी होणार, आठवड्याभरात जागावाटप ठरणार: शरद पवार

पुणे : आघाडी संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोबत आपल्या ३ बैठका पूर्ण झाल्या असल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी ‘द हिंदू’ ला दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. त्यामुळे शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जोमाने कामाला लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा निर्णय झाला असून येत्या आठवड्याभरात दोन्ही पक्षांमधील जागावाटप ठरणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि एनसीपी हे दोन्ही पक्ष त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार निवडणुकीआधी जाहीर करणार नसल्याचेही दोन्ही पक्षादरम्यान ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार की नाही हे सध्या सांगणं कठीण आहे असं सुद्धा पवार म्हणाले. परंतु भाजप व शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्ष यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु प्रकाश आंबेडकर जी भाजप विरोधात आघाडी उभी करण्याच्या तयारीत आहेत, त्यासाठी मी स्वतः उपस्थित राहणार नसून आमचे राज्य पातळीवरील नेते त्यात प्रतिनिधित्व करतील असं सुद्धा पवारांनी मुलाखती दरम्यान स्पष्ट केलं.

पुढे नाणार’बाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की, नाणार प्रकल्प व समृद्धी महामार्ग अशा प्रकल्पांबाबत महाराष्ट्र सरकारने स्थानिक जनतेला विश्वासात घेतले नसून ते लोकशाहीला धरून नाही, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x