मुंबई : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपावरुन काँग्रेस-एनसीपी’ची महत्वाची बैठक राधाकृष्ण विखेपाटील यांच्या बंगल्यावर पार पडली. त्यामुळे निवडणुकीपूर्वी सर्व जागांविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त असून आघाडी निश्चित असल्याचे समजते.
काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, संजय निरुपम तर एनसीपी’कडून अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड बैठकीला उपस्थित होते. या बैठकीच्या फेऱ्यांवरून आघाडी निश्चित असल्याचे समजते. तसेच बहुजन विकास आघाडी, सपा आणि बसपाला सुद्धा सोबत घेण्याचा निर्णय होऊ शकतो असं वृत्त आहे.
त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी निश्चित असल्याने आता भाजप आणि शिवसेनेवरील दबाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. युती न झाल्यास शिवसेना आणि भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
