23 April 2024 2:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम राहणार? अपडेटनंतर तज्ज्ञांचे मत काय? GTL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची कृपा झाली, स्वस्त GTL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

भाजपाने शिवसेनेला युतीत भरपूर त्रास दिला | त्यामुळे पुढची २५ वर्षे शिवसेना युती करणार नाही - आ. अमोल मिटकरी

MLA Amol Mitkari

पारनेर, १७ सप्टेंबर | सत्ता न मिळाल्याने भाजपामध्ये अस्वस्थता आहे. आपले आमदार फुटू नयेत म्हणून नारायण राणेंपासून चंद्रकांतदादांपर्यंत सत्ताबदलाची भविष्यवाणी व्यक्त करत आहेत. मूळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेले भावी सहकार्यांचे वक्तव्य हे भाजपासाठी नसून इतर एखाद्या जुन्या सहकार्याबद्दल होते, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी दिले आहे.

भाजपाने शिवसेनेला युतीत भरपूर त्रास दिला, त्यामुळे पुढची २५ वर्षे शिवसेना युती करणार नाही – NCP MLA Amol Mitkari reply on Raosaheb Danve’s statement on CM Uddhav Thackeray :

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघात आमदार निलेश लंके यांच्या विकासनिधीतून सुरू करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मिटकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

दानवे व्यासपीठावर असल्याने माध्यमांनी बाऊ केला:
मुख्यमंत्र्यांचे अनेक सहकारी आहेत. मात्र रावसाहेब दानवे व्यासपीठावर असल्याने पत्रकारांनी याविषयावर चर्चा केली, असे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. भाजपाने शिवसेनेला भरपूर त्रास दिलेला आहे. त्यामुळे किमान पुढची पंचवीस वर्षे शिवसेना युती करणार नाही. महाविकास आघाडी सरकार पुढची पंचवीस वर्षे टिकणार आहे आणि त्यातून नैराश्याने भाजपाचे नेते सरकारवर वारंवार टीका करत आहेत, असे मिटकरी यावेळी म्हणाले. नारायण राणे, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, प्रवीण दरेकरांना भीती आहे की आपल्या तंबुतील आमदार फुटून जातील, म्हणून वारंवार सरकार बदलण्याची भविष्यवाणी ही नेतेमंडळी करत असतात, असा आरोप मिटकरी यांनी केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: NCP MLA Amol Mitkari reply on Raosaheb Danve’s statement on CM Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#AmolMitkari(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x