नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटे पाक व्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राइक करून बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, सदर कारवाईत भारतीय प्रसार माध्यमांनी संरक्षण, परराष्ट्र व्यवहार किंवा भारतीय लष्कराकडून कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केली नसताना स्वतःच निरनिराळी आकडेवारी जाहीर करण्याची स्पर्धा लावली होती.

दरम्यान, सदर एअर स्ट्राईकनंतर स्वतःची पाठ थोपटवण्यात व्यस्त असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी २६/११ मधील मुंबईवरील दहशदवादी हल्ल्याचा आधार घेत विरोधकांनी काहीच केलं नसल्याचा आरोप केला आहे. वास्तविक मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात जेव्हा खुलेआम दहशदवादी हल्ला होतो, तेव्हा सामान्यांचा विचार करून कारवाई करणे किती कठीण होते याचा मोदींना अंदाज नसावा. त्यावेळी भारतीय नौदल वेस्टर्न कमांडचे कमांडो, एनएसजी कमांडो आणि मुंबई पोलिसांनी काय बलिदान दिलं होतं आणि दहशतवाद्यांना यमसदनी धाडून अजमल कसाबला मुंबई पोलीस कॉन्स्टेबल शहीद तुकाराम ओंबळे यांनी हातात कोणताही हत्यार नसताना त्याला जिवंत पकडले होते आणि पाकिस्तानला उघडं पाडलं होतं.

तसेच मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्यातील एकमेव जीवंत दहशतवादी अजमल कसाब याला कोणतीही वाच्यता न करता एका सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी दिली होती. विशेष म्हणजे भारताने कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमांचे आणि भारताच्या कायद्याचे उल्लंघन न करता त्याला फासावर लटकवले होते. तत्पूर्वी, दहशदवादी अजमल कसाबचा दयेचा अर्ज देखील त्यावेळी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी फेटाळला होता. कसाबला विशेष न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातर्फे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ लोक मारले गेले होते तर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि एनएसजी कमांडो देशासाठी शहीद झाले होते. त्यामुळे त्या घटनाक्रमवार प्रश्न उपस्थित करून आणि स्वतःला मोठं दाखवण्यासाठी मोदी त्या शहिदांचा अपमान करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे.

PM Narendra Modi forgot what happened after 26 September attack in Mumbai