1 May 2025 10:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

आदर्श ग्राम योजनेत सत्ताधाऱ्यांच्या खासदारांनाच रस नसल्याचं उघड

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी अशा ‘आदर्श ग्राम योजनेत’ भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांसहित लोकसभा आणि राज्यसभेतील तिसऱ्या टप्यात ७८ टक्के खासदारांनी या योजनेकडे अक्षरशः पाठ फिरवल्याच एका आकडेवारीतून समोर आलं आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची अनास्था समोर आली आहे. तब्बल ७८ टक्के खासदारांनी अजूनपर्यंत गाव देखील दत्तक घेतलेलं नाही.

त्या अनास्थेत केवळ लोकसभा आणि राज्यसभेतील खासदाराच नाही तर मोदींच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री सुद्धा असून त्यात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, अरुण जेटली, सदानंद गौडा, अनंत गीते, रविशंकर प्रसाद, अनंत कुमार, स्मृती इराणी, थावरचंद गेहलोत, धर्मेंद्र प्रधान आणि चौधरी बिरेंद्र सिंह यांच्यासह तब्बल 23 मंत्र्यांचा समावेश आहे.

त्यामुळे मोदींच्या या महत्वाकांक्षी योजनेत मंत्र्यांसहित खासदारांना सुद्धा रस नसल्याचे आकडेवारीत समोर आलं आहे. या योजनेअंतर्गत लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांनी एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करायचा असं अपेक्षित होत. परंतु खासदारांना गाव दत्तक घेण्यात रस नसल्याचे समोर आलं. विशेष म्हणजे जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने केंद्रातील मोदी सरकारने जो अहवाल जाहीर केला त्यातच ही पोलखोल झाली आहे.

सुरुवातीला थोडा रस दाखवला खरा, परंतु पुढच्या टप्यात हळूहळू अनास्था समोर येऊ लागल्याचे या अहवालात समजते. या योजनेच्या तिसऱ्या टप्यात खरा बोजबारा उडाल्याचे समजते. कारण लोकसभेतील आणि राज्यसभेतील एकूण ७८६ खासदारां पैकी ७०३ खासदारांनी गाव दत्तक घेतलं होत. तर दुसऱ्या टप्यात हा आकडा घसरून ४६६ वर आला आणि तिसऱ्या टप्यात तर हा आकडा इतका खाली आला की तब्बल ७८ टक्के खासदारांनी या योजनेकडे पूर्ण पाठ फिरवली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या