2 May 2025 1:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
x

राज्यावर दुष्काळाचं सावट तर मोदींच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्यासाठी २ कोटी खर्च

शिर्डी : सध्या राज्यावर दुष्काळाचं सावट आहे आणि राज्याच्या तिजोरीत सुद्धा खडखडाट असताना केवळ गर्दी जमविण्यासाठी आणि प्रोमोशनसाठी राज्य सरकारकडून मोदींच्या शिर्डीमधील कार्यक्रमावर तब्बल २ कोटीची उधळपट्टी करण्यात आल्याचे समजते. नियोजित ठिकाणी २० हजार घरकुल लाभार्थी कुटुंबीयांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले असून, जवळपास ४० हजार लोक उपस्थित राहण्याचे आयोजन सरकारकडून करण्यात आले आहे.

या महिन्याच्या १९ तारखेला शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या ई – गृहप्रवेश कार्यक्रमास जास्त माणसं जमावीत म्हणून राज्याच्या ग्रामविकास खात्याने तब्बल दोन कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याचे समजते. दरम्यान कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना नाश्ता प्रवासाची सोय आणि बसवर बॅनर्स लावून पोस्टरबाजी करण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून तुफान खर्च करण्यात येत आहे.

२० हजार घरकुल लाभार्थी सांगण्यात येत असले तरी ४० हजार लोकं उपस्थित राहू शकतील असे आयोजन करण्यात आले आहे. नेमक्या किती लोकांसाठी काय आयोजन करण्यात आले आहे?

नाशिक विभाग : २०,००० लाभार्थी आणि त्यांच्यासाठी ४०० बसेस
नगर विभाग : १२,००० लाभार्थी आणि त्यांच्यासाठी २४० बसेस
औरंगाबाद : ४,००० लाभार्थी आणि त्यांच्यासाठी ८० बसेस
बीड : २,००० लाभार्थी आणि त्यांच्यासाठी ४० बसेस
पुणे : २,००० लाभार्थी आणि त्यांच्यासाठी ४० बसेस

त्यानुसार तब्बल ८०० बसेसने ४०,००० लोकं आणण्यात येणार आहेत आणि त्यासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल २ कोटी रुपये इतकी रक्कम खर्च करण्यात येत आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते धनंजन मुंडे यांनी सरकारच्या या उधळपट्टीवर सडकून टीका केली आहे तसेच राज्य दुष्काळाच्या छायेत असताना आणि राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना केवळ मोदींच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमविण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून तब्बल २ कोटी रुपये खर्च केले जात आहेत असा थेट आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला आहे.

नेमकं काय ट्विट केलं आहे धनंजय मुंडे यांनी?

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या