भुनवेश्वर : सुप्रसिद्ध वरिष्ठ लेखिका गीता मेहता यांनी नुकताच घोषणा करण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार घेण्यास केंद्र सरकारला स्पष्ट नकार दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे सदर मानाचा पुरस्कार स्विकारण्याची ही योग्य वेळ नसल्याचे कारण गीता मेहता यांनी पुढे केले आहे. विशेष म्हणजे गीता मेहता या ओडिशाचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या मोठ्या बहिण आहेत.

दरम्यान, त्यांनी या निर्णयाची घोषणा थेट पत्रकार परिषदेत केली आणि मोदी सरकारला तोंडघशी पडल्याची चर्चा रंगली आहे. सदर विषयाला अनुसरून पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, ‘भारत सरकारने मला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं, याचा मला खूप आनंद आहे. तसेच मला या पुरस्काराच्या पात्रतेचं मानलं. परंतु, मी हा पुरस्कार स्विकारू शकत नसल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी नम्रपणे कळवले आहे. दरम्यान, भारतात लवकरच लोकसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. अशावेळी मी इतका मोठा पुरस्कार स्विकारल्यास जनमानसात चुकीचा संदेश जाईल, अशी शंका त्यांनी यावेळी संवाद साधताना व्यक्त केली. आणि तसे झाल्यास ते माझ्यासाठी तसेच केंद्र सरकारसाठी सुद्धा मानहानीकारक ठरेल आणि त्यासाठी मला नेहमीच दुःख होईल असं त्या म्हणाल्या.

गीता मेहता यांना शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार हा भारतातील चौथ्या क्रमाकांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो.

senior writer gita mehta have rejected padmashree award and linked it to lok sabha elections