2 May 2025 6:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

उद्योग मंत्रिपद शिवसेनेकडे; तरी राज्याच्या औद्योगिक घसरणीवरून सरकारवर टीका

मुंबई : औद्योगिक गुंतवणुकीच्या बाबतीत देशात सतत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राची आता अधोगती सुरु असताना शिवसेनेने सामना या मुखपत्रातून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. वास्तविक राज्याचं कॅबिनेट उद्योगमंत्री पद हे शिवसेनेच्या सुभाष देसाई यांच्याकडे असताना शिवसेनेने ही टीका केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नाणार’मधील टीकेनंतर आणि फसलेल्या उद्योगनीतीनंतर ५ वर्ष मंत्रिपद स्वतःकडे ठेऊन सर्व दोष भाजपाच्या माथी मारण्याचे प्रकार सुरु असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

सामना मधील अग्रलेखात म्हटलं आहे की,”गुजरात विकासाचे ‘मॉडेल’ संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून तिकडे सुद्धा गुंतवणूकदारांची संख्या घटली असल्याचे टले आहे. तसेच शेजारच्या कर्नाटकात मागील १० वर्षांपासून बिगर भाजप शासन सत्तेवर आहे तर महाराष्ट्र आणि गुजरातेत भाजपचे ‘मेक इन इंडिया’ राज्य आहे. पण तरी सुद्धा या दोन्ही राज्यांची औद्योगिक आणि आर्थिक घडी विस्कटलेली दिसते अशी टीका करण्यात आली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या विकासाचे अजगरी वेटोळे महागड्या मेट्रोभोवतीच पडले असून केवळ काही ठराविक उद्योगपतींच्या सोयीसाठी ‘अवनी’ नावाच्या वाघिणीस मारले जाते, असा सणसणीत टोला सुद्धा लगावला आहे.

दरम्यान, कर्नाटकने औद्योगिक गुंतवणुकीच्या बाबतीत झेप घेतली याचे दुःख नाही, पण महाराष्ट्र राज्य या बाबतीत का घसरला याचीच टोचणी असल्याची खंत शिवसेनेने व्यक्त केली आहे. तुम्ही विकासाच्या गॅसचे फुगे किती सुद्धा उडवले तरी योग्य वेळ येताच ते फुटतात. एकीकडे गुजरातेत ४,५०० कोटी इतका सरकारी निधी वापरून सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभा केला. तसा महाराष्ट्रात ३,५०० कोटी रुपये सरकारी खर्चाने छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा राहणार आहे, केवळ त्याला मुहूर्त सापडत नाही अशी टीका केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या