मुंबई : कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या अमित शहा यांनी ‘नवभारत टाइम्स’चे विशेष प्रतिनिधी गुलशन राय खत्री यांच्या बरोबर केलेल्या औपचारिक मुलाखती दरम्यान अमित शहा यांनी हे वक्तव्य केलं आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केल्यामुळे भाजपवर प्रचंड टीका होत आहे. त्यावेळी गुलशन राय खत्री यांनी अमित शहा यांच्याशी अनेक मुद्यांवर बातचीत केली, त्यावेळी अमित शहा यांना अनेक प्रश्न विचारले गेली. त्यातील एक प्रश्न हा २०१९ मधील लोकसभा निवडणुकी संदर्भातला होता.
गुलशन राय खत्री यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना अमित शहा म्हणाले की, भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष २०१९ मधील लोकसभा निवडणूक एकत्रित लढतील. तसेच आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्ष ‘टीडीपी’ स्वतःहून एनडीए मधून बाहेर गेला आहे असं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे.
