मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांनी धार्मिक राजकारण तापविण्यास सुरुवात केली आहे. आधीच भाजप समर्थक हिंदुत्ववादी संघटना अयोध्येत राम मंदिर उभारण्याची मागणी घेऊन २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत सभा आणि लॉन्गमार्च आयोजित करत आहेत. त्यात उद्या उद्धव ठाकरे कुटुंबीय सुद्धा आज विशेष विमानाने अयोध्येला प्रयाण करत आहेत. सध्या तणावाचे राजकीय आणि धार्मिक वातावरण निर्माण करून त्याचा पक्षाला कसा फायदा करून घेता येईल अशी सत्ताधाऱ्यांची रणनिती आहे.
दरम्यान, याआधीच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून हजारो शिवसैनिक अयोध्येच्या दिशेने २ दिवस आधीच रवाना झाले होते. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याच्या कुटुंबासह एका विशेष विमानाने अयोध्येत दाखल होणार आहेत. नाशिकहून जवळपास ३१ तासांचा मोठा प्रवास करुन अनेक कार्यकर्ते अयोध्येत दाखल झाले आहेत.
आज पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर असे सर्वजण एका विशेष चार्टर्ड विमानाने सकाळी अकरा वाजता मुंबईहून अयोध्येच्या दिशेने रवाना होणार आहेत. दरम्यान आज ते दुपारी २ च्या सुमारास फैजाबाद विमानतळावर आगमन करतील असं वृत्त आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आज प्रभू रामचंद्रांच्या पवित्र अयोध्यानगरीत आगमन होत आहे. रामाचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्यांना राममंदिराची आठवण करून देण्यासाठी अयोध्येत येत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱयाविषयी संपूर्ण देशात जबरदस्त उत्सुकता आहेhttps://t.co/4MZcEZo92G
— Saamana (@Saamanaonline) November 24, 2018
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अयोध्येतील नया घाट येथे शरयू आरती सुरू होताच मुंबईसह महाराष्ट्रातील मंदिरांमध्येही घंटानाद दुमदुमणार आहे.https://t.co/LGDW5MPSHU
— Saamana (@Saamanaonline) November 24, 2018
