अयोध्या : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे २ दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. आज सकाळीच ते सहकुटुंब एका विशेष विमानाने अयोध्येला रवाना झाले. परंतु त्यांचं कुटुंब ज्या विशेष विमानाने अयोध्येला गेलं ते अंबानी समूहाचं असल्याचं समोर येत आहे. तसा लोगो सुद्धा त्यावर स्पष्ट दिसत आहे.
त्यामुळे हे विशेष विमान रिलायन्स समूहाकडून उद्धव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी पुरविण्यात आलं आहे, असा थेट दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करून केला आहे. अंजली दमानिया यांनी यापूर्वी शिवसेनेला खंबाटा एरलाईन्सच्या घोटाळ्यावरून सुद्धा लक्ष केलं होतं.
विशेष म्हणजे अदाणी आणि अंबानी वरून नरेंद्र मोदींना लक्ष करणारे उद्धव ठाकरे सुद्धा उद्योगपतींची कशी राजकीय मदत घेतात ते समोर येत आहे. त्यामुळे अंजली दमाणियांच्या या टीकेला शिवसेना काही उत्तर देणार का ते पाहावं लागणार आहे.
काय ट्विट केलं आहे अंजली दमानिया यांनी?
A Reliance Chartered flight taken by Uddhav Thackeray for the trip to Ayodhya ? pic.twitter.com/5FDkLbObh7
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) November 24, 2018
