घनसावंगी : जालना आणि औरंगाबाद च्या दौऱ्यावर असलेले उध्दव ठाकरे यांची घनसावंगी येथे सभा झाली. सहसंपर्क प्रमुख हिकमत उढाण यांच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटन समारंभावेळी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याप्रसंगी त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं.

आम्हाला मिळालेली सत्ता ही कोणाच्या उपकरणे नाही तर शिवसैनिकांच्या मनगटाच्या जोरावर मिळाली आहे, असा त्यांनी विरोधकांचा समाचार या सभे वेळी घेतला. त्याप्रसंगी त्यांनी अजित पवारांच्या औरंगाबादमधील टीकेला ही उत्तर दिले. अजित पवारांच्या त्या टीकेला त्यांनी तितक्याच जहरी भाषेत उत्तर दिलं, ते म्हणाले की मी कासव व्हायला तयार आहे, पण धरणात लघुशंका करणारा अजित पवार होणार नाही.

आम्ही सत्तेत राहून शेतकऱ्यांचे भले होणार नसेल तर आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार विरोधात उभे राहणारच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त कर्ज माफी झाल्याचे सांगतात, परंतु कोणतीही आकडेवारी द्यायला तयार नाही. पुढे मोदींना उद्देशून ते म्हणाले अहमदाबाद मध्ये इस्त्राईलच्या पंतप्रधानांबरोबर पतंग उडविण्यापेक्षा कश्मीर मध्ये जाऊन तिरंगा फडकावा असा टोला त्यांनी मोदींना लगावला.

Udhav Thakarey criticised Ajit Pawar during speech at Aurangabad