नवी दिल्ली : एक दिवसापूर्वी सीआरपीएफच्या जवानांवर पुलवामा येथे झालेला भ्याड हल्ल्याचे पडसाद देशभर उमटले आहेत. देशभरातून संतप्त प्रतिकिया देखील येत आहेत. परंतु, पुलवामा मधील लष्कराच्या जवानांवर झालेला हा काही पहिला भीषण हल्ला नव्हता. यायाधी सुद्धा पुलवामातील प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी जोरदार हल्ला केला होता. परंतु देशवासीयांची विसरण्याची प्रवृत्ती राजकारण्यांच्या पथ्यावर पडते. तसं पुन्हा होऊ नये अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वी पुलवामा येथे लष्कराच्या प्रशिक्षण केंदावर हल्ला झाला होता तेव्हा, भाजपचे उत्तर प्रदेशातील रामपूरचे खासदार नेपाळसिंह यांना पत्रकारांनी पुलवामाच्या घटनेबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी एक विक्षिप्त प्रतिकिया दिली होती. ‘सैन्यातील जवान हे रोजच मरतात. इतकंच नाही तर जगाच्या पाठीवर असा कोणता देश आहे जिथे युध्दात सैनिक मरत नाहीत’ असं ही ते बरगळले होते.
त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या, परंतु त्यादेखील क्षणिक ठरल्या होत्या. एकीकडे जम्मू काश्मीरच्या पुलवामातील प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह प्रतिकिया देत होते की ‘आपल्या जवानांच बलिदान व्यर्थ जाणार नाही’. तर दुसरीकडे त्यांचेच भाजप सरकारमधील खासदार आपल्याच बहाद्दूर जवानांबद्दल असे विक्षिप्त विधान करत होते. त्यांच्या या विधानामुळे देशभर त्यावेळी देखील संतापाची लाट उसळली आहे. देशात तेच तेच प्रकार पुन्हा त्याच ठिकाणी घडत आहेत, परंतु दशवासियांची विसरण्याची प्रवृत्तीची आजही तिथेच आहे, हे देखील वास्तव आहे.
Video – पुलावामातील यापूर्वीच्या हल्ल्यानंतर काय म्हटलं होतं नेपाळसिंग यांनी;
