
Post Office Scheme | पोस्टमार्ट अनेक योजना सुरूच असतात. पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूकदाराला चांगला रिटर्न मिळण्याची शक्यता असते. तुम्ही किती पैशांची गुंतवणूक करता त्यावरूनच तुम्हाला किती रिटर्न मिळणार हे ठरतं. दरम्यान पोस्टाची ‘ग्राम सुरक्षा योजना’ देखील अतिशय उत्तम योजना आहे. या योजनेमुळे तुम्हाला प्रचंड फायदा होऊ शकतो.
भारतीय पोस्ट ऑफिसकडून दिल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी जोखीम घेऊन चांगलं रिटर्न मिळवू शकता. ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत व्यक्तीला बोनस मिळतो. सोबतच 80 वर्षाचे झाल्यानंतर किंवा मृत्यूच्या स्थितीत आल्यानंतर कायदेशीर वारस असलेल्या नामांकित व्यक्तीला जे सुद्धा पहिले होईल तेव्हा मिळते.
पॉलिसी सरेंडर करू शकता :
लाभार्थ्यांसाठी ही योजना कर्ज सुविधेसोबत येते, परंतु पॉलिसीधारकांना हा लाभ चार वर्षानंतर मिळतो. त्याचबरोबर तुम्ही ही पॉलिसी सरेंडर देखील करू शकता. यासाठी तुम्ही तीन वर्ष झाल्यानंतर पॉलिसी सरेंडर करू शकता परंतु तुम्हाला यामध्ये कोणताही लाभ मिळणार नाही. सोबतच इंडिया पोस्टद्वारे तुम्हाला बोनस आणि अंतिम घोषित बोनस दिला जातो. हा बोनस प्रति वर्ष 65 रुपये प्रति एक हजार रुपये आहे.
पॉलिसीची अट :
या पॉलिसीसाठी वयाची अट 19 ते 55 वर्षापर्यंतच्या कोणत्याही भारतीय नागरिकासाठी आहे. यामध्ये पैशांची गुंतवणूक करण्यासाठी त्रेमासिक, प्रीमियम पेमेंट, अर्धवार्षिक आणि वार्षिक दहा हजार ते दहा लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. एवढंच नाही तर ग्राहकांना प्रीमियम पेमेंट करण्यासाठी 30 दिवसाची सोड दिली गेली आहे. त्याचबरोबर ग्राहकाने प्रीमियम न भरल्यास पुन्हा पॉलिसी सुरू करून आधीचे पेमेंट करून सुरू ठेवू शकतो.
मॅच्युरिटी बेनिफिट:
एखाद्या व्यक्तीने 10 लाख रुपयांची ग्रामसुरक्षा पॉलिसी 19 वर्षांमध्येच खरेदी केली तर, पुढचे 55 वर्षांसाठी महिन्याचा प्रीमियम 1515 रुपये एवढा असेल. त्याचबरोबर 58 वर्षासाठी 1463 तर, 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. या हिशोबाने पॉलिसी धारकाला 55 वर्षांसाठी 31.60 लाख, 58 वर्षांकरिता 33.40 आणि 60 वर्षांकरिता 34.60 लाख रुपये मिळतील.
तुम्हाला योजनेबद्दल आणखीन विचारपूस किंवा माहिती मिळवायची असेल तर 1800 180 5232/155232 या टोल फ्री हेल्पलाइन नंबर चा वापर करू शकता. त्याचबरोबर www.postallifeinsurance.gov.in या दिल्या गेलेल्या अधिकृत वेबसाईटवर संपर्क करू शकता.