
Post Office Scheme | इंडिया पोस्ट ऑफिस आपल्या गुंतवणूकदारांसाठी विविध गुंतवणूक योजना राबवते. पोस्ट ऑफीस योजनेत गुंतवलेले पैसे सुरक्षित असतात कारण, या रकमेवर भारत सरकार स्वतः सुरक्षा हमी प्रदान करते. पोस्ट ऑफिसच्या बचत स्कीममध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला हमखास परतावा मिळू शकतो. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला एक निश्चित रकमेचा हमखास परतावा दिला जाईल, आणि या गुंतवणुकीवर बाजारातील कोणत्याही जोखमीच्या परिणाम होणार नाही. आपण ज्या गुंतवणूक योजनेची चर्चा करत आहोत तिचे नाव आहे, ‘पोस्ट ऑफीस ग्राम सुरक्षा योजना’. तुम्ही या योजनेत लहान रक्कम जमा करून गुंतवणूक सुरू करू शकतात.
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना :
इंडिया पोस्ट ऑफीसतर्फे राबवण्यात येणाऱ्या ग्राम सुरक्षा योजनेतील गुंतवणुकीवर प्रभावी परतावा मिळतो. या योजनेत गुंतवणूकदारांनी दरमहा 1500 रुपये जमा केले तर योजनेच्या परिपक्वतेच्या वेळी त्यांना सुमारे 31 ते 35 लाख रुपये परतावा मिळेल.
खाते कसे आणि कुठे उघडावे? :
19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणीही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत खाते उघडून गुंतवणूक सुरू करू शकतो. शिवाय पोस्ट ऑफीसच्या योजने अंतर्गत गुंतवणुकदारांना किमान 10,000 ते कमाल 10 लाख रुपयांपर्यंत विमा दिला जाईल. गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेचा प्रीमियम मासिक आधारावर, तिमाही आधारावर, सहामाही किंवा वार्षिक आधारावर जमा करू शकतात. गुंतवणूकदारांना प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देखील मिळतो.
कर्ज सुविधा :
पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक केल्यास योजना धारक अडचणीच्या वेळी कर्ज देखील घेऊ शकतात. तसेच गुंतवणूकदारांनी या योजनेत गुंतवणूक सुरू केल्यावर 3 वर्षांनंतर त्यांना पॉलिसी सरेंडर करण्याची परवानगी मिळते. तथापि, गुंतवणूकदारांनी योजना सरेंडर केल्यास त्यांना कोणताही लाभ मिळणार नाही.
35 लाख रुपये परतावा मिळवा :
समजा तुमचे सध्याचे वय 19 वर्षे असून 10 लाख रुपये रकमेच्या विमा पॉलिसी अंतर्गत तुम्ही दरमहा 1515 रुपये जमा करायला सुरुवात केली तर, 55 व्या वर्षी तुम्हाला 31.60 लाख रुपये परतावा मिळेल. 10 लाख रुपयेच्या पॉलिसी अंतर्गत 33.40 लाख रुपये मिळवण्यासाठी 58 वर्ष वयापर्यंत तुम्हाला 1463 रुपये प्रिमियम भरावा लागेल.आणि 34.60 लाख रुपये मिळण्यासाठी 60 व्या वर्षापर्यंत तुम्हाला 1411 रुपये प्रिमियम भरावा लागेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.