
Post Office Scheme | इंडिया पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण डाक योजनेत पैसे जमा करून तुम्ही मजबूत परतावा कमवू शकता. या योजनेत तुम्हाला मोठी रक्कम गुंतवणूक करण्याची गरज नाही. तर तुम्ही केवळ 100 रुपये जमा करून या योजनेत गुंतवणूक सुरू करु शकता. ही दीर्घकालीन योजना तुम्हाला भविष्यात आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि सक्षम बनवू शकते.
आजकाल आपण सर्व आपले आर्थिक भविष्य मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपण विविध गुंतवणूक योजना आणि, वेगवेगळ्या प्रकारच्या बचत खात्यात पैसे जमा करत असतो. इंडिया पोस्ट ऑफिसद्वारे आपल्या ग्राहकांसाठी अनेक गुंतवणूक योजना राबवल्या जातात. भारतातील करोडो लोक इंडिया पोस्ट ऑफिस योजनांवर विश्वास ठेवतात. कारण यात गुंतवलेली रक्कम सुरक्षित असते. हे पैसे कधीही बुडत नाही. इंडिया पोस्ट ऑफिस द्वारे अनेक योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक आहे, सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजन. ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील गरीब लोकांसाठी राबवली जाते.
10 लाख रुपयेचा विमा :
19 ते 45 वर्षे वयोगटातील कोणतीही भारतीय व्यक्ती सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स योजनेत पैसे जमा करू शकते. या योजनेत 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा कव्हर देण्यात आला आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दोन परिपक्वता कालावधी पर्याय दिले जाते. पहिला पर्याय असेल 15 वर्षे आणि दुसरा पर्याय असेल 20 वर्ष. तुम्ही तुम्हाला हवा तो परिपक्वता कालावधी निवडू शकता.
जर समजा तुम्ही सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स योजनेत गुंतवणूक सुरू केल्यावर 15 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधी निवडला तर, 6 व्या, 9 व्या, आणि 12 व्या वर्षी तुम्हाला विमा रकमेच्या 20-20-20 टक्के रक्कम दिली जाईल. तर, 20 वर्षांच्या मॅच्युरिटीवर विमाधारकाला 8, 12, 16 वर्षे कालावधी पूर्ण झाल्यावर 20-20-20 टक्के रक्कम दिली जाईल आणि उर्वरित 40 टक्के रक्कम परिपक्वता रकमेसह बोनस दिला जाईल.
समजा तुमचे सध्याचे वय 25 वर्ष आहे, आणि तुम्ही 7 लाख रुपयांची विमा पोलिसी घेतली आणि, त्याचा परिपक्वता कालावधी 20 वर्ष निश्चित केला तर तुम्हाला दररोज 95 रुपये प्रीमियम जमा करावे लागेल. अशाप्रकारे तुमची मासिक गुंतवणूक रक्कम 2850 रुपये असेल आणि सहामाही गुंतवणूक रक्कम 17,100 रुपये असेल. योजनेचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर तुम्हाला 14 लाख रुपये परतावा मिळेल.
14 लाख कमावण्याचे गणित :
20 वर्षांच्या विमा पॉलिसीमध्ये तुम्हाला 7 लाख रुपयांच्या विमा रकमेसह एकूण विमा रकमेच्या 20 टक्के रक्कम 8व्या, 12व्या आणि 16 व्या वर्षी कॅशबॅक म्हणून दिली जाईल. या 7 लाख विमा रकमेवर 20 टक्के म्हणजे 1.4 लाख रुपये तुम्हाला 3 वेळा मिळतील. आणि उर्वरित रक्कम तुम्हाला योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यावर बोनस सकट दिली जाईल.
योजना परिपक्व झाल्यावर किती परतावा मिळेल? :
योजनेचा 20 वर्ष परिपक्वता कालावधी पूर्ण झाल्यास तुम्हाला 2.8 लाख रुपये परतावा मिळेल. यानंतर, तुम्हाला वार्षिक 48 रुपये प्रति हजार बोनस रक्कम दिली जाईल. 20 वर्ष कालावधीत ही बोनस रक्कम 6.72 लाख रुपये होईल. अशा प्रकारे, तुम्हाला योजनेच्या मॅच्युरिटीवर एकूण 9.52 लाख रुपये परतावा मिळेल. मनी बॅक आणि स्कीम मॅच्युरिटी रिटर्न्स दोन्ही मिळून तुम्हाला 13.72 लाख रुपये परतावा मिळेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.