मेलबर्न : कसोटी मालिकेपाठोपाठ आता वनडे मालिका देखील जिंकून भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियात आणखी एक पराक्रम करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, आजच्या एकदिवसीय सामन्यात युझवेंद्र चहलच्या फिरकीसमोर कांगारूंनी अक्षरश: नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले.

कांगारूंचा संपूर्ण संघ २३० धावांमध्ये तंबूत परतला. आता भारतापुढे विजयासाठी २३१ धावांचं लक्ष आहे. आजच्या सामन्यात भारताकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. त्याला भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने २-२ बळी घेत चांगली साथ दिली. भारतीय फलंदाज सध्या मैदानावर उतरले आहेत आणि पुढे काय होतं ते पाहावं लागणार आहे.

ind vs india third one cricket match at melbourn